शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन!

By admin | Updated: August 22, 2016 17:17 IST

मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला

विद्यार्थिनींना दिलासा: केरळ बालहक्क आयोगाचा निकालथिरुवनंतपुरम: मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला असून शाळांनी अशी सक्ती करू नये, असा आदेश दिला आहे.कासरगोड जिल्ह्यातील चिमीनी येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलीने केलेल्या तक्रारीवर आयोगाच्या अध्यक्षा शोभा कोशी आणि सदस्य के. नासिर व सी.यू. मीना यांनी हा निर्णय दिला. मात्र विद्यार्थिनींनी शाळेत येताना पिंजारलेल्या केसांनी न येता ते व्यवस्थित विंचरून आणि वर एकत्र बांधून यावे, असा नियम शाळा करू शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले. शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह करू नये, असा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने जारी करावा, असे निर्देश आयोगाने दिले.केरळमधील मुली आठवड्यातून एकदा नव्हे तर दररोज केसावरून आंघोळ करतात, या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनीने आयोगाकडे तक्रार केली होती. तिचे म्हणणे असे होते की, सकाळी शाळेत येण्याच्या घाईच्या वेळी केस नीट न वाळवता त्यांच्या घट्ट वेण्या बांधल्या तर केसांना कुबट वास येतो. शिवाय केसांत कोंडा होतो व खाज सुटून डोक्यावर चट्टे उठतात. यावर उपाय म्हणून अनेक मुली आंघोळ न करताच शाळेत येतात.शिवाय मुलांनी केस कसे राखावेत याविषयी कोणताही नियम नसताना फक्त मुलींनाच दोन वेण्या घालून शाळेत येण्याचा आग्रह धरणे हा लिंगभेदी पक्षपात आहे, असेही प्रतिपादन या तक्रारीत करण्यात आले होते.तक्रारदाराशी सहमती दर्शवित आयोगाने म्हटले की, सकाळी लवकर उठून मुलींनी स्वत:चे सर्व आवरायचे, राहिला असेल तर गृहपाठ पूर्ण करायचा आणि या सर्व घाईगर्दीत वेण्याही घालायच्या हे खूपच अडचणीचे आहे. शिवाय हल्ली बहुतांश आयाही नोकरी करीत असल्याने सकाळच्या वेळी त्यांचीही घाई असते, त्यामुळे त्यांनाही मुलीच्या वेण्या घालून देणे शक्य होईलच असे नाही. अशा परिस्थितीत शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह धरणे हे विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक तणावात भर टाकणारे असल्याने हे त्यांच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे.कासरगोड जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी के. बाबू यांनी या तक्रारदार मुलीच्या शाळेत जाऊन चौकशी केला असता बहुसंख्य विद्यार्थिनींचा दोन वेण्यांच्या सक्तीला विरोध असल्याचे दिसले होते. त्यांनी तसा अहवाल आयोगास दिला होता.केस लांबसडक असतील तर व्यवस्थित वेणी घालता येते व ती दिवसभर न सुटता चांगली घट्ट राहते. आखूड केसांच्या दोन वेण्या घातल्या तर त्या शेंडीसारख्या दिसतात व त्यामुळे आपण ‘ध्यान’ दिसतो याचे मुलींच्या मनावर कायम दडपण येते, असेके. नासिर, सदस्य, केरळ बालहक्क आयोग यांनी सांगितले.