शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बालकांच्या शोषणाच्या तक्रारी; सात वर्षांची मुदत वाढवून द्या -मनेका गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 02:47 IST

महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात सुरू ‘मी टू’चे स्वागत करताना, बालकांच्या लैंगिक शोषणा-विरोधात तक्रारी दाखल करण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात सुरू ‘मी टू’चे स्वागत करताना, बालकांच्या लैंगिक शोषणा-विरोधात तक्रारी दाखल करण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला; मात्र या मोहिमेला स्वैर स्वरूप येता कामा नये आणि ही मोहीम नियंत्रणाबाहेर जाता कामा नये, असे आवाहन करून मनेका गांधी म्हणाल्या की, काही ना काही कारणास्तव ज्यांच्याकडून अपमान झाला आहे, त्यांना या मोहिमेद्वारे बदनाम वा लक्ष्य करू नये. जो पुरुष अशी कृत्ये करतो, तो कायमच महिलांच्या लक्षात राहतो. त्यामुळेच अगदी १० ते १५ वर्षांनीही महिलांना तक्रार करता यावी.कायदा मंत्रालय नक्की विचार करीलबालकांच्या शोषणाविरोधातही तक्रार करण्यासाठी अशीच मुभा असावी, बालकाने सज्ञान झाल्यावर वा वयाच्या १८ व्या वर्षी तक्रार केली तरी ती दाखल करण्यात यावी आणि त्याआधारे कारवाई करण्यात यावी, असे आपले म्हणणे आहे. सध्या शोषण झाल्यापासून सात वर्षांच्या आतच अशी तक्रार करता येते, हे खरे आहे. त्यामुळे कायदा मंत्रालयाने तक्रार करण्यासाठीची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. आपल्या या सूचनेवर कायदा मंत्रालयावर निश्चितच विचार करील, अशी आशा आहे, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी