शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मुख्यमंत्री करणार दक्षिणचे समाधान

By admin | Updated: July 19, 2015 21:34 IST

- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवसनागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर घेतल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे दुसरे समाधान शिबिर २ ऑगस्ट रोजी दक्षिण नागपुरातील मतदारांसाठी ईश्वर देशमुख ...


- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवस
नागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर घेतल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे दुसरे समाधान शिबिर २ ऑगस्ट रोजी दक्षिण नागपुरातील मतदारांसाठी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमाननगर येथे होत आहे. या शिबिरासाठी तक्रारी देण्यासाठी २० जुलै ही अंतिम तारीख आहे.
शिबिरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या शिबिराची माहिती दक्षिण नागपुरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी रविवारी आ. सुधाकर कोहळे यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांचे अर्ज दाखल करून घेण्याचे आवाहन केले. आ. सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, नागरिकांना वैयक्तिक तक्रारी सोडविण्याची ही संधी आहे. शिबिरात २५ ते ३० विभागाचे स्टॉल राहतील. यासाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. नागरिकांनी महापालिकेच्या हनुमाननगर व नेहरूनगर झोनमध्ये जाऊन तीन प्रतीत तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन कोहळे यांनी केले.
चौकट...
असा करा अर्ज
- अर्ज तीन प्रतीत करावा
- एका अर्जात एकाच विभागाशी संबंधित तक्रार असावी
- नोकरी- बदली संदर्भात अर्ज करू नये
- न्यायप्रविष्ट प्रकरणांचे अर्ज करू नये