शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

सहारनपूर दंगलीसाठी मुख्यमंत्री जबाबदार - भाजप

By admin | Updated: July 27, 2014 13:10 IST

उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगलीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव जबाबदार असून जातीय तणाव निर्माण करुन सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे असा आरोप भाजपने केला आहे.

ऑनलाइन टीम

सहारनगपूर, दि. २७ - उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगलीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव जबाबदार असून जातीय तणाव निर्माण करुन सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे असा आरोप भाजपने केला आहे. अखिलेश यादव सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरत असल्याची टीकाही भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांनी केली आहे. 
सहारनपूर येथे जमिनीशी निगडीत वादातून शनिवारी दोन समाजात दंगल भडकली होती. या दंगलीत तिघांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.  तणावामुळे सहारनपूर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी दंगलीप्रकरणी २४ जणांना अटक केली असून संशयीतांची चौकशीही सुरु आहे. रविवारी सकाळपासून सहारनपूर येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी संध्या तिवारी म्हणाले, संचारबंदी शिथील करण्याचा अद्याप कोणताही विचार नसून शांतता कायम राहल्यास अधिका-यांशी याविषयावर चर्चा करु.  मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
दरम्यान, या दंगलीवरुन राजकारणही सुरु झाले आहे. समाजवादी पक्षाने दंगलीसाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे. तर भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षाला दंगलीसाठी जबाबदार ठरवले आहे. हुसैन म्हणाले, उत्तरप्रदेशमधील सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करायचा आहे. तर काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी उत्तरप्रदेशचे विभाजन करावे अशी मागणी केली आहे.