शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

निवडणुकीचा अर्ज न भरताच परतले मिझोरमचे मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 06:09 IST

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सरछिपमधून अर्ज भरण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री लाल थनहवला यांना मंगळवारी तो सादर न करताच परतावे लागले.

ऐझॉल : विधानसभेच्या निवडणुकीसाठी सरछिपमधून अर्ज भरण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री लाल थनहवला यांना मंगळवारी तो सादर न करताच परतावे लागले. मिझोरमचे मुख्य निवडणूक आयुक्त बी. एस. शशांक यांच्याविरोधात सध्या प्रत्येक निवडणूक कार्यालयासमोर निदर्शने सुरू असून, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आपला अर्ज सादर न करण्याचा निर्णय घेतला.मुख्यमंत्री अर्ज भरायला गेले, तेव्हा तेथे कोणीही अडवले नाही. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर न करण्याचा निर्णय घेतला, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. निवडणूक कार्यालयाबाहेरील परिस्थिती पाहून ते स्वत:हून निघून गेले, असे हा अधिकारी म्हणाला. मिझोरममधील ४० जागांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ९ नोव्हेंबर आहे. म्हणजे त्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. मतदान २८ नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल. सध्याच्या विधानसभेची मुदत १५ डिसेंबर रोजी संपत आहे.मुख्य निवडणूक अधिकारी बी. एस. शशांक यांच्या ब्रू समुदायातील सुमारे ११ हजार लोकांना मतदान करू देण्याच्या निर्णयास मिझोरममधील अनेक संघटनांचा विरोध आहे. लोकसभेच्या वेळी ब्रू समुदायाच्या लोकांनी मतदान केले होते. त्यामुळे आताही आपणास मतदान करू द्यावे, अशी त्यांची मागणी असून, त्यांना तो अधिकार देऊ नये, असे संघटनांचे म्हणणे आहे; पण शशांक यांनी त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने त्यांनाच आता हटवावे, अशी मागणी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयासमोर निदर्शने केली जात आहेत. बी. एस. शशांक यांनी राज्याचे प्रधान सचिव (गृह विभाग) यांना निवडणूक कामातून काढल्याचाही राग या संघटनांनी व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)सरकारचीहीतीच भूमिकाशशांक यांना हटवा, अशी विनंती मुख्यमंत्री लाल थनहवला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. त्यांना न हटवल्यास लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर मिझोरममधील जनतेचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, असेही या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. ईशान्य भारतातील मिझोरम हे एकमेव राज्य सध्या काँग्रेसकडे आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMizoram Assembly Election 2018मिझोराम विधानसभा निवडणूक 2018