शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

शेतकऱ्यांचं मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांचं उपोषण

By admin | Updated: June 10, 2017 14:36 IST

शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. 10- मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य प्रदेश पूर्णपणे अशांत झालं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाज साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत राज्यामधील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धारही मुख्यमंत्री चौहान यांनी केला आहे.  चौहान हे भोपाळमधील दसरा मैदानात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दसरा मैदानावर पोहोचले आहेत. मंचावर चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थितीत आहेत.
 
उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचं मत शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनाच आदर आहे. काही लोकांकडून राज्यातील परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला जातं आहे, यासाठी लहान मुलांच्या हातात दगडं दिली जातात, असंही ते म्हणाले आहेत. जेव्हा सरकार चर्चेसाठी तयार नसतं, तेव्हा आंदोलन केलं जावं. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असं शिवराजसिंह चौहान त्यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी म्हटलं होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव देणं हे निश्चित केलं जाईल. आमच्या सरकारचे लक्ष्य हे राज्य आणि राज्यातील जनतेचा विकास करणं आहे, असं स्पष्टिकरण शिवराजसिंह चौहान यांनी दिलं आहे.  
 
शेतकरी संपाला का लागलं हिंसक वळण ?
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन  हिंसक झालं. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केलं. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली.