शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकऱ्यांचं मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांचं उपोषण

By admin | Updated: June 10, 2017 14:36 IST

शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. 10- मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य प्रदेश पूर्णपणे अशांत झालं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांची मनं वळविण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाज साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत राज्यामधील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धारही मुख्यमंत्री चौहान यांनी केला आहे.  चौहान हे भोपाळमधील दसरा मैदानात लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री दसरा मैदानावर पोहोचले आहेत. मंचावर चौहान यांच्या पत्नी साधना सिंह, ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थितीत आहेत.
 
उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचं मत शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनाच आदर आहे. काही लोकांकडून राज्यातील परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला जातं आहे, यासाठी लहान मुलांच्या हातात दगडं दिली जातात, असंही ते म्हणाले आहेत. जेव्हा सरकार चर्चेसाठी तयार नसतं, तेव्हा आंदोलन केलं जावं. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असं शिवराजसिंह चौहान त्यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी म्हटलं होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव देणं हे निश्चित केलं जाईल. आमच्या सरकारचे लक्ष्य हे राज्य आणि राज्यातील जनतेचा विकास करणं आहे, असं स्पष्टिकरण शिवराजसिंह चौहान यांनी दिलं आहे.  
 
शेतकरी संपाला का लागलं हिंसक वळण ?
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन  हिंसक झालं. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केलं. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली.