शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 04:05 IST

केजरीवालांच्या गैरहजेरीने कामकाज ठप्प झाल्याची कबुलीच आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले.

नवी दिल्लीअरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतरही त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहणे हा त्यांचा निर्णय  'वैयक्तिक' आहे ; पण याचा अर्थ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुलभूत हक्क पायदळी तुडवले जावेत असा होत नाही. राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती अनिश्चित काळासाठी गैरहजर आणि संवादहीन राहू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे.

केजरीवालांच्या गैरहजेरीने कामकाज ठप्प झाल्याची कबुलीच आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. लाखो विद्यार्थी सुविधांपासून वंचित असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश मनमोहन, न्या. मनमीत पीएस अरोरा यांच्या पीठाने  केजरीवाल, सरकार आणि पालिकेला जबाबदार ठरविले.

केजरीवाल यांची अटकच बेकायदेशीर : आपचा युक्तिवाद

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांची ईडीने केलेली अटकच बेकायदेशीर आहे. ते दोषी असल्याचे ईडीला दीड वर्षापासून माहिती होते तर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरच का अटक करण्यात आली, असा सवाल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी केला.

ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे. आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या पीठापुढे केजरीवाल यांच्या याचिकेवर सिंघवी यांनी तासभर युक्तिवाद केला.

केजरीवाल-पत्नी सुनीता यांची तुरुंगात भेट

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि मंत्री आतिशी यांनी सोमवारी तिहार तुरुंगात त्यांची भेट घेतली. भेटीनंतर अतिशी म्हणाल्या की, केजरीवाल यांनी उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

‘आप’ने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता केजरीवाल यांना सोमवारी केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. पक्षाने दावा केला की, यापूर्वी तिहार तुरुंग प्रशासनाने यासाठी परवानगी दिली नव्हती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या वक्तव्यानंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल हेच कायम राहणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

भाजपने भरला मानहानीचा खटला

भाजपमध्ये सामील होण्यासाठी दिल्लीच्या ‘आप’च्या आमदारांना प्रलोभने दाखवल्याचा आरोप केल्याबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल आणि मंत्री आतिशी सिंह यांच्याविरुद्ध राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात भाजपने मानहानीचा खटला भरला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCourtन्यायालय