शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 04:05 IST

केजरीवालांच्या गैरहजेरीने कामकाज ठप्प झाल्याची कबुलीच आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले.

नवी दिल्लीअरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतरही त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहणे हा त्यांचा निर्णय  'वैयक्तिक' आहे ; पण याचा अर्थ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुलभूत हक्क पायदळी तुडवले जावेत असा होत नाही. राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती अनिश्चित काळासाठी गैरहजर आणि संवादहीन राहू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे.

केजरीवालांच्या गैरहजेरीने कामकाज ठप्प झाल्याची कबुलीच आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. लाखो विद्यार्थी सुविधांपासून वंचित असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश मनमोहन, न्या. मनमीत पीएस अरोरा यांच्या पीठाने  केजरीवाल, सरकार आणि पालिकेला जबाबदार ठरविले.

केजरीवाल यांची अटकच बेकायदेशीर : आपचा युक्तिवाद

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांची ईडीने केलेली अटकच बेकायदेशीर आहे. ते दोषी असल्याचे ईडीला दीड वर्षापासून माहिती होते तर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरच का अटक करण्यात आली, असा सवाल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी केला.

ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे. आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या पीठापुढे केजरीवाल यांच्या याचिकेवर सिंघवी यांनी तासभर युक्तिवाद केला.

केजरीवाल-पत्नी सुनीता यांची तुरुंगात भेट

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि मंत्री आतिशी यांनी सोमवारी तिहार तुरुंगात त्यांची भेट घेतली. भेटीनंतर अतिशी म्हणाल्या की, केजरीवाल यांनी उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

‘आप’ने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता केजरीवाल यांना सोमवारी केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. पक्षाने दावा केला की, यापूर्वी तिहार तुरुंग प्रशासनाने यासाठी परवानगी दिली नव्हती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या वक्तव्यानंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल हेच कायम राहणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

भाजपने भरला मानहानीचा खटला

भाजपमध्ये सामील होण्यासाठी दिल्लीच्या ‘आप’च्या आमदारांना प्रलोभने दाखवल्याचा आरोप केल्याबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल आणि मंत्री आतिशी सिंह यांच्याविरुद्ध राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात भाजपने मानहानीचा खटला भरला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCourtन्यायालय