शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भगवत्गीतेचे महत्त्व जगाने मान्य केले मुख्यमंत्री : राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नागपूर : भगवत्गीतेचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गीता भेट देणे यातच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

नागपूर : भगवत्गीतेचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गीता भेट देणे यातच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतर्फे आयोजित भगवत्गीतेवरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव दत्ताजी टेकाडे, सहसचिव मेघा नांदेडकर, प्राचार्य संध्या नायर, प्रा.राजीव हडप, डॉ. सुधाकर इंगळे व वाणिज्य विभागप्रमुख राजीव आष्टेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,जगातील अनेक संस्कृती काळाच्या ओघात लोप पावल्या. पण भारतीय संस्कृती वेगवेगळे आक्रमणे झाल्यानंतरही जिवंत राहिली. कारण तिचे शाश्वत मूल्य भक्कम होते. त्यामुळे आपली संस्कृती इतरांवर थोपविण्याची कधी गरजच भासली नाही. गीता नुसता धर्म नाही. यात व्यवस्थापनाचे शास्त्र दडले आहे. जगानेही ही बाब वेगवेगळ्या माध्यमातून मान्य केली आहे. गीतेचा सार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
यावेळी प्राचार्य संध्या नायर यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन प्रा. गोविंद भट्टा यांनी केले. प्रतिनिधींच्यावतीने अमिता डिसोझा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी योगानंद काळे, आर.एल. देशपांडे, व्ही.जी. शास्त्री, प्रभुजी देशपांडे, वामनराव जोशी, भालचंद्र देशपांडे, राजीव हडप, डॉ. सुधाकर इंगळे, वंदना व श्रीनिवास वर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विशाखा जोशी यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. संदीपा सुरजुसे यांनी मानले. विद्या बोरकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची संागता झाली. (प्रतिनिधी)