शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
4
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
5
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
6
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
7
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
8
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
9
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
10
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
11
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
12
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
13
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
14
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
15
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
16
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
17
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
18
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
19
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
20
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही; न्या. चेलमेश्वर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:49 IST

सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी एक न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले गेले, तर आम्ही चार न्यायाधीशांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल, असेही ते म्हणाले. हार्वर्ड क्लब आॅफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील मुलाखतीत न्या. चेलमेश्वर यांनी अनेक विषयावर भाष्य केले.या वेळी न्या. चेलमेश्वर म्हणाले की, मला आशा आहे की, न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले जाणार नाही, पण असे झाल्यास आम्ही तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जे सांगितले होते, ते खरे ठरेल. १२ जानेवारी रोजी न्या. चेलमेश्वर आणि त्यांचे तीन सहकारी न्या. गोगोई, मदन बी. लोकुर आणि कुरियन जोसेफ यांनी एका पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थत केले होते. विशेषत: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून खटल्यांचे होणारे वाटप याबाबत आक्षेप नोंदविले होते.न्या. चेलमेश्वर हे जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. सेवा-ज्येष्ठतेच्या बाबतीत न्या. गोगोई हे सरन्यायाधीश पदासाठी दावेदार समजले जातात.>जनहिताचे मुद्देही सोडविले जावेतसरन्यायाधीशांबद्दल विचारले असता, चेलमेश्वर म्हणाले की, ‘मी ज्योतिषी नाही. सरन्यायाधीशांकडे निश्चितच हा अधिकार आहे की, त्यांनी न्यायपीठाची स्थापना करावी, पण घटनात्मक तरतुदीनुसार, सर्व अधिकारांसह काही जबाबदाºयाही जोडल्या गेलेल्या आहेत. अधिकारांचा वापर केला जावा, पण त्यासोबतच जनहिताचे मुद्देही सोडविले जावेत. त्या अधिकाराचा उपयोग केवळ यासाठी करू शकत नाहीत. कारण तो अधिकार आपल्याकडे आहे.’

टॅग्स :Courtन्यायालय