शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही; न्या. चेलमेश्वर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:49 IST

सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी एक न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले गेले, तर आम्ही चार न्यायाधीशांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल, असेही ते म्हणाले. हार्वर्ड क्लब आॅफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील मुलाखतीत न्या. चेलमेश्वर यांनी अनेक विषयावर भाष्य केले.या वेळी न्या. चेलमेश्वर म्हणाले की, मला आशा आहे की, न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले जाणार नाही, पण असे झाल्यास आम्ही तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जे सांगितले होते, ते खरे ठरेल. १२ जानेवारी रोजी न्या. चेलमेश्वर आणि त्यांचे तीन सहकारी न्या. गोगोई, मदन बी. लोकुर आणि कुरियन जोसेफ यांनी एका पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थत केले होते. विशेषत: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून खटल्यांचे होणारे वाटप याबाबत आक्षेप नोंदविले होते.न्या. चेलमेश्वर हे जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. सेवा-ज्येष्ठतेच्या बाबतीत न्या. गोगोई हे सरन्यायाधीश पदासाठी दावेदार समजले जातात.>जनहिताचे मुद्देही सोडविले जावेतसरन्यायाधीशांबद्दल विचारले असता, चेलमेश्वर म्हणाले की, ‘मी ज्योतिषी नाही. सरन्यायाधीशांकडे निश्चितच हा अधिकार आहे की, त्यांनी न्यायपीठाची स्थापना करावी, पण घटनात्मक तरतुदीनुसार, सर्व अधिकारांसह काही जबाबदाºयाही जोडल्या गेलेल्या आहेत. अधिकारांचा वापर केला जावा, पण त्यासोबतच जनहिताचे मुद्देही सोडविले जावेत. त्या अधिकाराचा उपयोग केवळ यासाठी करू शकत नाहीत. कारण तो अधिकार आपल्याकडे आहे.’

टॅग्स :Courtन्यायालय