शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'हिड़मा अभी जिंदा है…', नक्षलवाद्यांचा दावा; आमचा कमांडर अजूनही जिवंत, सर्जिकल स्ट्राईक फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:13 IST

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला नक्षलवाद्यांनी अपयशी ठरवले आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला नक्षलवाद्यांनी अपयशी ठरवले आहे. छत्तीसगडमधील बस्तर, नक्षलग्रस्त भागात झालेला सर्जिकल स्ट्राईक फेल ठरल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे. नक्षल कमांडर हिडमा मरण पावला नसून तो अजूनही जिवंत असल्याचं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या निवेदनात नक्षल कमांडर हिडमा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस दलाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

नक्षवाद्यांचा प्रवक्ता समता यांनी जारी केलेल्या निवेदनात माओवादी बटालियन कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार झाल्याची माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. माओवाद्यांनी कथित हवाई हल्ल्याची छायाचित्रे जारी केली आहेत. नक्षलवाद्यांच्या दाव्यानुसार ११ जानेवारी हा छत्तीसगडच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस ठरला आहे. सुकमा आणि विजापूरच्या सीमेवरील ठिकाणे बॉम्बफेक, ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई हल्ले करण्यात आली. हवाई दल आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडोचा वापर करून सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यांनी हेलिकॉप्टरमधून अंदाधुंद गोळीबार केला आणि आम्ही चोख प्रत्युत्तर दिले, सहा जवान जखमी झाले आणि सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश हाणून पाडला, असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. 

'पाणी, जंगले कॉर्पोरेट घराण्यांच्या ताब्यात देण्यास सरकार तयार'छत्तीसगड आणि बस्तरमधील नैसर्गिक क्षेत्र कॉर्पोरेट घराण्यांना देण्यासाठी सरकार या घटना घडवत असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. लोकांना त्यांच्या जमिनी आणि जंगलातून हुसकावून लावण्याचा सरकारचा डाव आहे. एप्रिल २०२१ आणि एप्रिल २०२२ मध्ये सुरक्षा दलांनी बस्तरमध्ये केलेला हा तिसरा बॉम्बस्फोट असल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकमध्ये पीएलजीएचे सदस्य पोटम हांगी मारले गेल्याचं त्यांनी कबुल केलं आहे.

नक्षलवाद्यांचा दावा पोलिसांनी फेटाळलानक्षलवाद्यांचा दावा फेटाळून लावत बस्तर रेंजचे आयजीपी पी सुंदरराज म्हणाले की, नक्षलवादी लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे दावे करत आहेत. छत्तीसगड आणि बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना पराभूत केलं जात आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही मनोधैर्य खचत आहे. लोकांना भडकवण्याचा कट रचला जात आहे, परंतु सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे आयजींनी सांगितले आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड