शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रेसाठी जाताय? आधी बदललेले नियम जाणून घ्या मगच प्लॅनिंग करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:20 IST

चारधाम यात्रेदरम्यान नियमात झाला मोठा बदल

Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रा ही देशातील एक महत्त्वाची यात्रा मानली जाते. अनेक भाविक दरवर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जातात. ही चारधाम यात्रा भाविकांना वेगळंच समाधान देऊन जाते. मात्र या यात्रेदरम्यान विविध कारणांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा शंभरीपार गेला आहे. आतापर्यंत केदारनाथ धाममध्ये ४९, ब्रदीनाथ धाममध्ये २०, गंगोत्री धाममध्ये ७ तर यमुनोत्री धाममध्ये २५ भाविकांचा आरोग्याच्या तक्रारींमुळे व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारीदेखील केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे प्रत्येकी एका भाविकाचा मृत्यू झाला. हाच मुद्दा लक्षात घेत, चारधाम यात्रेसंबंधीच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

काय आहे तो बदल-

गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्याच्या तक्रारींमुळे झालेले मृत्यू पाहता, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी असलेल्या नियमावलीत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदल ५० वर्षांवरील प्रवासी भाविकांसाठी आहे. ५० वर्षावरील एखाद्या व्यक्तीला जर चारधाम यात्रा करायची असेल तर नव्या नियमानुसार, त्यांना हेल्थ चेकअप करणं अनिवार्य असणार आहे. जर आरोग्य तपासणीत ते पूर्णत: फिट असले तरच त्यांना चारधाम यात्रेची परवानगी दिली जाणार आहे.

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, उत्तराखंडच्या आरोग्य महासंचालक शैलजा भट्ट यांनी सांगितले की, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या ५० आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी केएस चौहान यांनीही याची पुष्टी केली की ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

भाविकांच्या वाढत्या मृत्यूचं कारण काय-

रुद्रप्रयागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बीके शुक्ला यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणीत पास न होणाऱ्या प्रवाशांना परत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रदीप भारद्वाज हे केदारनाथमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पुरवतात. त्यांना गेल्या काही काळात वाढत जाणाऱ्या मृत्यूंच्या संख्येसाठी भाविकांची प्रचंड गर्दी, अनुकूल वातावरण निर्माण करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, कोविडचा भाविकांच्या आरोग्यावर झालेला प्रभाव आणि ऋतू बदल या घटकांना जबाबदार धरलं आहे.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंड