शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रेसाठी जाताय? आधी बदललेले नियम जाणून घ्या मगच प्लॅनिंग करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:20 IST

चारधाम यात्रेदरम्यान नियमात झाला मोठा बदल

Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रा ही देशातील एक महत्त्वाची यात्रा मानली जाते. अनेक भाविक दरवर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जातात. ही चारधाम यात्रा भाविकांना वेगळंच समाधान देऊन जाते. मात्र या यात्रेदरम्यान विविध कारणांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा शंभरीपार गेला आहे. आतापर्यंत केदारनाथ धाममध्ये ४९, ब्रदीनाथ धाममध्ये २०, गंगोत्री धाममध्ये ७ तर यमुनोत्री धाममध्ये २५ भाविकांचा आरोग्याच्या तक्रारींमुळे व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारीदेखील केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे प्रत्येकी एका भाविकाचा मृत्यू झाला. हाच मुद्दा लक्षात घेत, चारधाम यात्रेसंबंधीच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

काय आहे तो बदल-

गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्याच्या तक्रारींमुळे झालेले मृत्यू पाहता, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी असलेल्या नियमावलीत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदल ५० वर्षांवरील प्रवासी भाविकांसाठी आहे. ५० वर्षावरील एखाद्या व्यक्तीला जर चारधाम यात्रा करायची असेल तर नव्या नियमानुसार, त्यांना हेल्थ चेकअप करणं अनिवार्य असणार आहे. जर आरोग्य तपासणीत ते पूर्णत: फिट असले तरच त्यांना चारधाम यात्रेची परवानगी दिली जाणार आहे.

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, उत्तराखंडच्या आरोग्य महासंचालक शैलजा भट्ट यांनी सांगितले की, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या ५० आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी केएस चौहान यांनीही याची पुष्टी केली की ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

भाविकांच्या वाढत्या मृत्यूचं कारण काय-

रुद्रप्रयागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बीके शुक्ला यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणीत पास न होणाऱ्या प्रवाशांना परत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रदीप भारद्वाज हे केदारनाथमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पुरवतात. त्यांना गेल्या काही काळात वाढत जाणाऱ्या मृत्यूंच्या संख्येसाठी भाविकांची प्रचंड गर्दी, अनुकूल वातावरण निर्माण करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, कोविडचा भाविकांच्या आरोग्यावर झालेला प्रभाव आणि ऋतू बदल या घटकांना जबाबदार धरलं आहे.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंड