शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रेसाठी जाताय? आधी बदललेले नियम जाणून घ्या मगच प्लॅनिंग करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:20 IST

चारधाम यात्रेदरम्यान नियमात झाला मोठा बदल

Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रा ही देशातील एक महत्त्वाची यात्रा मानली जाते. अनेक भाविक दरवर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जातात. ही चारधाम यात्रा भाविकांना वेगळंच समाधान देऊन जाते. मात्र या यात्रेदरम्यान विविध कारणांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा शंभरीपार गेला आहे. आतापर्यंत केदारनाथ धाममध्ये ४९, ब्रदीनाथ धाममध्ये २०, गंगोत्री धाममध्ये ७ तर यमुनोत्री धाममध्ये २५ भाविकांचा आरोग्याच्या तक्रारींमुळे व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारीदेखील केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे प्रत्येकी एका भाविकाचा मृत्यू झाला. हाच मुद्दा लक्षात घेत, चारधाम यात्रेसंबंधीच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

काय आहे तो बदल-

गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्याच्या तक्रारींमुळे झालेले मृत्यू पाहता, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी असलेल्या नियमावलीत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदल ५० वर्षांवरील प्रवासी भाविकांसाठी आहे. ५० वर्षावरील एखाद्या व्यक्तीला जर चारधाम यात्रा करायची असेल तर नव्या नियमानुसार, त्यांना हेल्थ चेकअप करणं अनिवार्य असणार आहे. जर आरोग्य तपासणीत ते पूर्णत: फिट असले तरच त्यांना चारधाम यात्रेची परवानगी दिली जाणार आहे.

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, उत्तराखंडच्या आरोग्य महासंचालक शैलजा भट्ट यांनी सांगितले की, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या ५० आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी केएस चौहान यांनीही याची पुष्टी केली की ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

भाविकांच्या वाढत्या मृत्यूचं कारण काय-

रुद्रप्रयागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बीके शुक्ला यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणीत पास न होणाऱ्या प्रवाशांना परत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रदीप भारद्वाज हे केदारनाथमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पुरवतात. त्यांना गेल्या काही काळात वाढत जाणाऱ्या मृत्यूंच्या संख्येसाठी भाविकांची प्रचंड गर्दी, अनुकूल वातावरण निर्माण करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, कोविडचा भाविकांच्या आरोग्यावर झालेला प्रभाव आणि ऋतू बदल या घटकांना जबाबदार धरलं आहे.

टॅग्स :KedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंड