शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चारधाम यात्रेसाठी आता कर्नाटकात ‘आधार’ हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:04 IST

कर्नाटकातून उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेला जाणा-यांसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कर्नाटक सरकार माणशी २० हजार रुपयांचे प्रवास अनुदान देते.

बंगळुरू : कर्नाटकातून उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेला जाणा-यांसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कर्नाटक सरकार माणशी २० हजार रुपयांचे प्रवास अनुदान देते. त्याचा संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.या चारधाम यात्रेसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यानुसार या यात्रेच्या अनुदानासाठी अर्ज करणा-याला आधारकार्ड सादर करावे लागेल. धार्मिक कामकाज विभागाच्या अधिका-याने म्हटले आहे की, कर्नाटकचे कायमचे रहिवासी असलेले जवळपास १,००० ते १,५०० लोक दरवर्षी चारधाम यात्रेच्या अनुदानाचा लाभ घेतात. या वर्षी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या संख्येतील खासगी यात्रा आयोजकांनी या अनुदानाचे आमिष दाखवायला सुरुवात केली आहे. या परिस्थिती या अनुदानाचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता आहे किंवा लोक प्रवासाची बनावट कागदपत्रे सादर करू शकतील.हे टाळण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटकचे रहिवासी असलेल्यांना २०१४ पासून हे अनुदान दिले जात आहे. मध्यमवर्गीयांना या चारधाम यात्रेला जाता यावे, म्हणून सिद्धरामय्या सरकारने हे अनुदान द्यायला सुरवात केली होती. भाजपा सरकारने मानसरोवर यात्रसाठी प्रत्येकाला ३० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. 

टॅग्स :Governmentसरकार