शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:54 IST

बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला.

ठळक मुद्देइस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी चांद्रयान-२चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.  

तमाम भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. दुपारी बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के सिवन यांनी उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि सगळ्यांचाच ऊर भरून आला. 'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आता पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करणार असल्याचं सिवन यांनी जाहीर केलं, तेव्हा इस्रोबद्दलचा आदर दुणावला. 

'भारताने दुसऱ्या चांद्रमोहीमेसाठी घेतलेली झेप ही ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात आहे. आजवर जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याचा हा प्रवास आहे', असं सिवन म्हणाले. गेला आठवडाभर दिवसरात्र एक करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.  

गेल्या रविवारी - १५ जुलैला मध्यरात्री 'चांद्रयान-२' अवकाशी झेपावणार होतं. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी तांत्रिक कारणामुळे हे उड्डाण स्थगित करावं लागलं होतं. इस्रोच्या शास्रज्ञांनी चिकाटीनं यानातील त्रुटी दुरुस्त केली आणि आज या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांचं चीज झालं. चांद्रयान-२च्या भरारीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता ६ सप्टेंबरला हे यान चंद्रावर उतरेल. 

 या यशस्वी उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून, शेकहँड करून आणि सहकाऱ्यांची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. त्यावेळी आपल्या यशोगाथेबद्दल बोलताना के सिवन यांचा कंठही दाटून आला होता. घर-दार विसरून, वैयक्तिक सुख-दुःख बाजूला ठेवून प्रत्येक वैज्ञानिक अविश्रांत झटला आहे. गेले सात दिवस तर प्रत्येकानेच झपाटल्यागत काम केलं. तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. त्याच जोरावर आज आपण चंद्राच्या दिशेनं ऐतिहासिक प्रवास सुरू केला आहे, अशा भावना सिवन यांनी व्यक्त केल्या. आजचा दिवस फक्त इस्रो किंवा भारतासाठीच नव्हे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विश्वासाठीही गौरवाचा आहे. आम्हाला भारताचा झेंडा यापुढेही उंचच उंच फडकवत ठेवायचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.  

चांद्रयान-२ चं प्रक्षेपण आणि के सिवन यांचं भाषणः

 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी