शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2: 'हा तिरंग्याचा सन्मान'; इस्रो प्रमुखांची विनम्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:54 IST

बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला.

ठळक मुद्देइस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी चांद्रयान-२चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.  

तमाम भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. दुपारी बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के सिवन यांनी उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि सगळ्यांचाच ऊर भरून आला. 'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आता पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करणार असल्याचं सिवन यांनी जाहीर केलं, तेव्हा इस्रोबद्दलचा आदर दुणावला. 

'भारताने दुसऱ्या चांद्रमोहीमेसाठी घेतलेली झेप ही ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात आहे. आजवर जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याचा हा प्रवास आहे', असं सिवन म्हणाले. गेला आठवडाभर दिवसरात्र एक करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.  

गेल्या रविवारी - १५ जुलैला मध्यरात्री 'चांद्रयान-२' अवकाशी झेपावणार होतं. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी तांत्रिक कारणामुळे हे उड्डाण स्थगित करावं लागलं होतं. इस्रोच्या शास्रज्ञांनी चिकाटीनं यानातील त्रुटी दुरुस्त केली आणि आज या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांचं चीज झालं. चांद्रयान-२च्या भरारीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता ६ सप्टेंबरला हे यान चंद्रावर उतरेल. 

 या यशस्वी उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून, शेकहँड करून आणि सहकाऱ्यांची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. त्यावेळी आपल्या यशोगाथेबद्दल बोलताना के सिवन यांचा कंठही दाटून आला होता. घर-दार विसरून, वैयक्तिक सुख-दुःख बाजूला ठेवून प्रत्येक वैज्ञानिक अविश्रांत झटला आहे. गेले सात दिवस तर प्रत्येकानेच झपाटल्यागत काम केलं. तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. त्याच जोरावर आज आपण चंद्राच्या दिशेनं ऐतिहासिक प्रवास सुरू केला आहे, अशा भावना सिवन यांनी व्यक्त केल्या. आजचा दिवस फक्त इस्रो किंवा भारतासाठीच नव्हे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विश्वासाठीही गौरवाचा आहे. आम्हाला भारताचा झेंडा यापुढेही उंचच उंच फडकवत ठेवायचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.  

चांद्रयान-२ चं प्रक्षेपण आणि के सिवन यांचं भाषणः

 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी