शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

चंद्रभागा भागविणार लातूरची तहान

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पंढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तयार केला असून, त्याबाबत रेल्वे विभागाला पत्रही दिले आहे.

पंढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तयार केला असून, त्याबाबत रेल्वे विभागाला पत्रही दिले आहे.
लातूर शहराची लोकसंख्या सुमारे चार लाख असून दररोज चाळीस एम.एल.डी पाणी लागते. इतका पाणीपुरवठा करणारे पाण्याचे सर्व स्रोत आता ठप्प होत असल्याने आता रेल्वेने पाणी नेण्याची योजना केली आहे.
मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्?ातील पाण्याची व चार्‍याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 550 कोटी रुपयांचा निधी दिला त्यातून लातूर, बीड, उस्मानाबादला रेल्वेने पाणी आणण्याची योजना आखली गेली आहे.
रेल्वेने पाणी नेण्याची योजना अंमलात आणली तर उजनीतून भीमेत पुन्हा विसर्ग करावा लागणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाशी जिल्हाधिकार्‍यांनी पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------------
रेल्वेने असे येईल पाणी
--
पंढरपूर ते लातूरसाठी स्वतंत्र पाण्याच्या व्ॉगन (टँकर) रेल्वे सोडावी लागणार आहे. एका व्ॉगनमध्ये 51 हजार लिटर पाणी बसते. त्यामुळे सुमारे 50 व्ॉगनची रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे एका खेपेत 25 लाख लिटर पाणी नेता येणार आहे.
---
अडचणी या आहेत
---
पंढरपूर ते लातूर लोहमार्गाचे अंतर 207 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे पंढरपूरवरून निघालेल्या रेल्वेला लातूरपर्यंत पोहोचण्यासाठी आठ तास लागतात. हा लोहमार्ग एकेरी असल्याने पाणी घेऊन जाणार्‍या रेल्वेसाठी जाताना आठ तास व येताना आठ तासासाठी असे नवे नियोजन करावे लागणार आहे त्यामुळे नियमित धावणार्‍या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकामध्ये व्यत्यय येतो त्यामुळे वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे.
---
कोट 1
पंढरपूर ते लातूरच्या पन्नास व्ॉगनच्या रेल्वेसाठी साधारण 52 हजार रुपये भाडे आकारले जाते. त्याची पूर्तता झाल्यावर पाणी देणे शक्य होणार आहे.
भास्कर राव
असिस्टंट कर्मशियल मॅनेजर, सोलापूर.
----------------
कोट -2
पंढरपूर ते लातूरला रेल्वेने पाणी नेण्यासाठी अद्याप पंढरपूर रेल्वे कार्यालयाला अधिकृत पत्र आले नाही. त्यामुळे सध्यातरी कोणतेच बदल नाहीत.
राजेश वर्मा
सहायक मंडल इंजिनिअर,पंढरपूर.
-----पूर्ण--