शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

चंद्राबाबूंचे मानसिक संतुलन ढळले - चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:51 IST

हैदराबाद, तेलंगणातील विकासाने तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू अस्वस्थ झाले असून, त्यांनी तेलंगणाचा नाश करण्याचा विडाच उचलला आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : हैदराबाद, तेलंगणातील विकासाने तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू अस्वस्थ झाले असून, त्यांनी तेलंगणाचा नाश करण्याचा विडाच उचलला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.आपणच हैदराबादचा विकास केला, असे चंद्राबाबू सांगतात. नशीब चारमिनारही आपण उभारला, असे ते सांगत नाहीत. अन्यथा कुतूब शहा यांनी आत्महत्या केली असती. त्यामुळे मानसिक संतुलन ढळलेल्या चंद्राबाबूंनी मेन्टल चेकअप करून घ्यावे, असेही केसीआरयेथील प्रचारसभेत म्हणाले. मोदींच्या पंतप्रधान आवास योजनेचा अद्याप कोणत्याच गरीब कुटुंबाला फायदा झाल्याचे दिसले नाही. मात्र, आमचे सरकार गरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, आम्ही सर्व समाजातील गरीब, कष्टकरी जनतेबरोबरच दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळेच या वेळी जनता आम्हालाच संधी देईल, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.केसीआर यांचे पुत्र केटीआर म्हणाले की, काँग्रेसने ६० वर्षांत कोणताच विकास केला नाही. विकास म्हणजे काय, हेच त्यांना माहिती नाही. आता टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी विकास म्हणजे काय ते दाखवून द्यावे. काँग्रेसला टीडीपीने साथ दिल्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे टीआरएसचे कार्यकर्ते या संधीचे सोने करतील.>मतांच्या राजकारणात जातोय घुबडांचा जीवघुबड हे दुर्दैव वा वाईट नशिबाचे प्रतीक आहे, असे अनेकांना वाटते. ती अर्थातच अंधश्रद्धा असली तरी निवडणुकांत समोरच्या उमेदवारांचा विजय होऊ नये, म्हणून अनेक जण घुबडांचा वापर करतात. तेलंगणाही त्याला अपवाद नाही. सध्या अनेक उमेदवारांनी त्यामुळेच घुबडे मागवायला सुरुवात केली आहेत. ती आणली जात आहेत, कर्नाटकातून. घुबडांना मारून टाकायचे आणि त्याचे पंख, शरीर विरोधी उमेदवाराच्या घरासमोर फेकायचे... तसे केले की तो हमखास पराभूत होतो, असा समज आहे.अलीकडेच कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यात सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घुबडे ताब्यात घेण्यात आली. ती का आणली हा प्रश्न विचारता जी माहिती मिळाली, ती ऐकून पोलीस हबकूनच गेले. ही घुबडे त्यांनी विकायला आणली होती. कर्नाटकात एका घुबडाची किंमत सध्या तीन ते चार लाख रुपये मिळत आहे. कर्नाटकातील जमखिंडी, बेळगाव व बागलकोटमधून ही घुबडे आणण्यात आली होती. ती हैदराबादला नेण्यात येणार होती. अर्थात घुबडांमुळे नशिबाचे फासे उलटे पडत नाहीत आणि हा समज म्हणजे अंधश्रद्धा आहे. पण निवडणुकांत विजयासाठी उमेदवार वाटेल त्या पातळीवर जातात, हे या निमित्ताने उघड झाले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018