शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबूंचे मानसिक संतुलन ढळले - चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:51 IST

हैदराबाद, तेलंगणातील विकासाने तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू अस्वस्थ झाले असून, त्यांनी तेलंगणाचा नाश करण्याचा विडाच उचलला आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : हैदराबाद, तेलंगणातील विकासाने तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू अस्वस्थ झाले असून, त्यांनी तेलंगणाचा नाश करण्याचा विडाच उचलला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.आपणच हैदराबादचा विकास केला, असे चंद्राबाबू सांगतात. नशीब चारमिनारही आपण उभारला, असे ते सांगत नाहीत. अन्यथा कुतूब शहा यांनी आत्महत्या केली असती. त्यामुळे मानसिक संतुलन ढळलेल्या चंद्राबाबूंनी मेन्टल चेकअप करून घ्यावे, असेही केसीआरयेथील प्रचारसभेत म्हणाले. मोदींच्या पंतप्रधान आवास योजनेचा अद्याप कोणत्याच गरीब कुटुंबाला फायदा झाल्याचे दिसले नाही. मात्र, आमचे सरकार गरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, आम्ही सर्व समाजातील गरीब, कष्टकरी जनतेबरोबरच दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळेच या वेळी जनता आम्हालाच संधी देईल, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.केसीआर यांचे पुत्र केटीआर म्हणाले की, काँग्रेसने ६० वर्षांत कोणताच विकास केला नाही. विकास म्हणजे काय, हेच त्यांना माहिती नाही. आता टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी विकास म्हणजे काय ते दाखवून द्यावे. काँग्रेसला टीडीपीने साथ दिल्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे टीआरएसचे कार्यकर्ते या संधीचे सोने करतील.>मतांच्या राजकारणात जातोय घुबडांचा जीवघुबड हे दुर्दैव वा वाईट नशिबाचे प्रतीक आहे, असे अनेकांना वाटते. ती अर्थातच अंधश्रद्धा असली तरी निवडणुकांत समोरच्या उमेदवारांचा विजय होऊ नये, म्हणून अनेक जण घुबडांचा वापर करतात. तेलंगणाही त्याला अपवाद नाही. सध्या अनेक उमेदवारांनी त्यामुळेच घुबडे मागवायला सुरुवात केली आहेत. ती आणली जात आहेत, कर्नाटकातून. घुबडांना मारून टाकायचे आणि त्याचे पंख, शरीर विरोधी उमेदवाराच्या घरासमोर फेकायचे... तसे केले की तो हमखास पराभूत होतो, असा समज आहे.अलीकडेच कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यात सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घुबडे ताब्यात घेण्यात आली. ती का आणली हा प्रश्न विचारता जी माहिती मिळाली, ती ऐकून पोलीस हबकूनच गेले. ही घुबडे त्यांनी विकायला आणली होती. कर्नाटकात एका घुबडाची किंमत सध्या तीन ते चार लाख रुपये मिळत आहे. कर्नाटकातील जमखिंडी, बेळगाव व बागलकोटमधून ही घुबडे आणण्यात आली होती. ती हैदराबादला नेण्यात येणार होती. अर्थात घुबडांमुळे नशिबाचे फासे उलटे पडत नाहीत आणि हा समज म्हणजे अंधश्रद्धा आहे. पण निवडणुकांत विजयासाठी उमेदवार वाटेल त्या पातळीवर जातात, हे या निमित्ताने उघड झाले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018