शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आंध्र प्रदेश व ओडिशात पुन्हा येणार चंद्राबाबू आणि नवीनबाबूंचे सरकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:12 IST

राज्यात सत्ता मिळणार; पण लोकसभेत मात्र फटका

अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत विजय मिळवून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कदाचित पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतील. मात्र, केंद्र सरकारच्या स्थापनेत किंगमेकर बनण्याचे त्यांचे स्वप्न कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांच्यामुळे भंग पावण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यामध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाला तेलुगू देसम पक्षापेक्षा (टीडीपी) जास्त जागा मिळतील, असा निष्कर्ष एक्झिट पोलनी व्यक्त केला आहे.

लगडपती राजा गोपाल सर्वेक्षणातून असा निष्कर्ष आला की, आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत टीडीपीला ९० ते ११० जागा मिळतील. वायएसआर काँग्रेसला ६५ ते ७९ व अन्य पक्षांना १ ते ५ जागा मिळतील. आरजी फ्लॅश पोलमध्येही टीडीपीचेच सरकार पुन्हा राज्यात सत्तेवर येणार असे म्हटलेआहे.

न्यूज १८-आयपीएसओएसच्या पोलने म्हटले आहे की, वायएसआर काँग्रेसला १३ तर टीडीपीला ११ लोकसभेच्या जागा मिळतील. रिपब्लिक-सी व्होटरच्या पोलचा निष्कर्ष आहे की, टीडीपीला १४ तर वायएसआर काँग्रेसला ११ लोकसभेच्या जागा मिळतील. एनडीए, यूपीएला आंध्र प्रदेशमध्ये एकही जागा जिंकता येणार नाही. चाणक्य-न्यूज२४ ने टीडीपीला १७ तर वायएसआर काँग्रेसला ८ लोकसभेच्या जागा मिळतील, असे भाकीत केलेआहे. (वृत्तसंस्था)स्पष्ट बहुमताचा अंदाजभुवनेश्वर : ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल. मात्र, राज्यात भाजप बिजदपेक्षा लोकसभेच्या अधिक जागा जिंकेल, असा एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा असून, त्यापैकी भाजपला ६ ते १९ व बिजदला २ ते १५ जागांवर विजय मिळेल, असे या निष्कर्षांत म्हटले आहे.काँग्रेसला कदाचित एखादी जागा जिंकता येईल किंवा त्या पक्षाच्या हाती शून्य उरेल. संवाद-कनक पोलमध्ये राज्यात भाजपला लोकसभेच्या १२ जागा, बिजदला ६ जागा मिळतील, असे म्हटले आहे. टाइम्स नाऊच्या पोलमध्ये बिजदला ८, भाजपला १२, काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.147सदस्यांच्या ओडिशा विधानसभा निवडणुकांत संवाद-कनक न्यूज पोलच्या निष्कर्षानुसार बिजद ८५ ते ९५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवेल. भाजपला २१ ते ३४, काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत बिजदने ११७, काँग्रेसने १६ व भाजपने १० जागा जिंकल्या होत्या.