शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश निवडीच्या नव्या पद्धतीस सुप्रीम कोर्टात आव्हान

By admin | Updated: August 22, 2014 01:49 IST

‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी मोदी सरकारने प्रस्तावित केलेली नवी पद्धत प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तिच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची गेली 20 वर्षे प्रचलित असलेली ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी यासाठी सहा सदस्यांचा एक राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग नेमण्याची मोदी सरकारने प्रस्तावित केलेली नवी पद्धत प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तिच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयही त्यावर तातडीने सुनावणी घेणार आहे.
ही नवी पद्धत लागू करण्यासाठी मोदी सरकारने गेल्याच आठवडय़ात 121 वे घटनादुरुस्ती विधेयक व राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग विधेयक अशी दोन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली. संघराज्यातील किमान निम्म्या राज्यांनी या घटनादुरुस्तीस संमती दिल्यानंतर व राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतरच ही नवी पद्धत प्रत्यक्षात अमलात येणार आहे. यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्याआधीच या प्रस्तावित बदलाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल झाल्या आहेत. ज्या दिवशी ही विधेयके लोकसभेने मंजूर केली त्याच दिवशी सरन्यायाधीश न्या. आर. एम.लोढा यांनी ‘कॉलेजियम’ पद्धतीचे जोरदार समर्थन केले होते; पण ते त्यांनी उत्स्फूर्तपणो केलेले मौखिक भाष्य होते. आता येऊ घातलेल्या नव्या पद्धतीचा न्यायिक निकषांवर कस लावण्याचे काम सर्वोच्च न्यायालयास करायचे आहे.
माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विश्वजित भट्टाचार्य यांच्यासह आर. के. कपूर व मनोहर लाल शर्मा या तीन वकिलांनी व ‘सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड’ या वकील संघटनेने या याचिका केल्या आहेत. या याचिकांवर लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती अजर्दारांच्या वकिलांनी गुरुवारी केली तेव्हा याचिका येत्या सोमवारी सुनावणीसाठी येणार असल्याचे सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले.
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निवडीच्या नव्या पद्धतीसाठी संसदेने मंजूर केलेली दोन्ही विधेयके घटनाबाह्य असल्याचे नमूद करताना याचिकाकत्र्याचे असे म्हणणो आहे की, कार्यपालिका आणि न्यायपालिका परस्परांपासून पूर्णपणो स्वतंत्र असणो हे नि:पक्ष न्यायसंस्थेचे मूलभूत बलस्थान असून राज्यघटनेच्या अनुच्छेद 5क् मध्ये नेमके हेच अधोरेखित केले गेले आहे.
याचिकाकत्र्याचे असेही म्हणणो आहे की, न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य व निष्पक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा अविभाज्य भाग आहे व त्यास धक्का लागेल अशी घटनादुरुस्ती करण्याचा संसदेसही अधिकार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4199क् च्या दशकात लागोपाठ तीन निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ न्यायाधीशांच्या निवडप्रक्रियेत न्यायसंस्थेचे अर्निबध प्राबल्य प्रस्थापित केले. हे निकाल देताना न्यायालयाने एक प्रकारे घटनादुरुस्ती करून आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे त्याही वेळी स्पष्ट झाले होते. परंतु न्यायसंस्थेला अंगावर न घेण्याच्या बोटचेप्या सरकारी धोरणामुळे न्यायसंस्थेचे हे अतिक्रमण दोन दशके निमूटपणो सहन केले गेले. गेल्या काही वर्षात हा विषय ख:या अर्थाने ऐरणीवर आला. 
 
4आधीच्या ‘संपुआ’ सरकारनेही ही विकृती सुधारण्यासाठी पुढाकार घेतला; पण त्यासाठी मांडलेली विधेयके संसदेत मंजूर होऊ शकली नव्हती. आता संसदेने ती मंजूर केली आहेत व त्यांची घटनात्मक वैधता तपासण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करणार आहे. एका परीने एका बाजूला संसद व कार्यपालिका व दुसरीकडे न्यायपालिका अशा संभाव्य घटनात्मक संघर्षाची ही नांदी ठरण्याची शक्यता आहे.