शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोरोना लसींच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर करण्यास केंद्राची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:28 IST

सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना वाटते. 

हरिश गुप्ता - 

नवी दिल्ली : भारत चार कोटी लोकांना लस देण्याच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलदगतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे, हेही अत्यंत कौतुकास्पद आहे. मात्र कोरोना लसीमुळे झालेल्या दुष्परिणामांच्या घटनांची सविस्तर माहिती जाहीर करणे केंद्र सरकार टाळत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  (The Centre's refusal to disclose information on the side effects of the corona vaccine)सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना वाटते. ६० वर्षे वयावरील सर्व व्यक्ती तसेच एकापेक्षा जास्त व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील व्यक्तींनी ही कोरोना लस घ्यायला हवी, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या व अन्य दुष्परिणाम होतात, असे निदर्शनास आल्यानंतर युरोपातील १२ देशांनी या लसीचा वापर स्थगित केला. मात्र भारतात लसीकरण मोहिमेत कोविशिल्डचा वापर अद्यापही कायम ठेवला आहे.  कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे ७० जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुष्परिणाम झालेल्या २०० पैकी ९० जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये नुकतीच झळकली होती. मात्र यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.लसीकरणावर सरकारचे बारीक लक्ष -कोरोना साथीसंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या कृती दलाचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, लसीकरणामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिनचे कोणावर दुष्परिणाम होतात का, याकडे केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. यासंदर्भातील काही गंभीर प्रकरणे निदर्शनास आली, तर त्याची माहिती सर्वांना दिली जाईल. कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोना लसीचे ६.५ टक्के डोस वाया -देशात कोरोना लसीचे ६.५ टक्के डोस वाया जात आहेत. उपलब्ध डोसचा अधिकाधिक वापर करण्यात यावा, असे केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. कोरोना लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण आंध्र प्रदेशमध्ये ११.६ टक्के व तेलंगणात १७.६ टक्के आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारmedicineऔषधं