शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोना लसींच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर करण्यास केंद्राची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:28 IST

सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना वाटते. 

हरिश गुप्ता - 

नवी दिल्ली : भारत चार कोटी लोकांना लस देण्याच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलदगतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे, हेही अत्यंत कौतुकास्पद आहे. मात्र कोरोना लसीमुळे झालेल्या दुष्परिणामांच्या घटनांची सविस्तर माहिती जाहीर करणे केंद्र सरकार टाळत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  (The Centre's refusal to disclose information on the side effects of the corona vaccine)सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना वाटते. ६० वर्षे वयावरील सर्व व्यक्ती तसेच एकापेक्षा जास्त व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील व्यक्तींनी ही कोरोना लस घ्यायला हवी, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या व अन्य दुष्परिणाम होतात, असे निदर्शनास आल्यानंतर युरोपातील १२ देशांनी या लसीचा वापर स्थगित केला. मात्र भारतात लसीकरण मोहिमेत कोविशिल्डचा वापर अद्यापही कायम ठेवला आहे.  कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे ७० जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुष्परिणाम झालेल्या २०० पैकी ९० जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये नुकतीच झळकली होती. मात्र यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.लसीकरणावर सरकारचे बारीक लक्ष -कोरोना साथीसंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या कृती दलाचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, लसीकरणामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिनचे कोणावर दुष्परिणाम होतात का, याकडे केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. यासंदर्भातील काही गंभीर प्रकरणे निदर्शनास आली, तर त्याची माहिती सर्वांना दिली जाईल. कोवॅक्सिन व कोविशिल्ड या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोना लसीचे ६.५ टक्के डोस वाया -देशात कोरोना लसीचे ६.५ टक्के डोस वाया जात आहेत. उपलब्ध डोसचा अधिकाधिक वापर करण्यात यावा, असे केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. कोरोना लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण आंध्र प्रदेशमध्ये ११.६ टक्के व तेलंगणात १७.६ टक्के आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारmedicineऔषधं