शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:31 IST

प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

नवी दिल्ली : चवीला सीमा लागत नाहीत. भारतीय पाककृतींमध्ये सीमा ओलांडण्याची ताकद आहे. आम्ही जगभरात आपली शेती आणि खाद्य निर्यात वाढवण्याच्या विचारांसह पुढे जात आहोत, असे केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले. इंडस फूड २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रक्रिया केलेले अन्न हे आपले भविष्य आहे. त्यांची वाढती मागणीच विकासासाठी प्रचंड शक्यता निर्माण करते. त्यामुळे तुमच्या जेवणाच्या विविध चवी जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जा आणि भारताच्या अनोख्या पाककृतींना जगातील अॅम्बेसिडर बनवा. प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

अन्न सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही निर्यातीला प्रोत्साहन देत १०० नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा (फूड टेस्टिंग लॅब) उघडणार आहोत. गेल्या काही वर्षांत, इंड्स फूड हे भारतातील सर्वोत्तम आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यापार प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले आहे, ज्यामुळे एफ अँड बी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले.

प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल - चिरागबदलत्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या कुटुंब रचनेमुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल आणि भविष्यातील हे लक्ष्य आहे. कारण त्यात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे चिराग पासवान म्हणाले. दरम्यान, या तीन दिवसांच्या इंडस फूड २०२५ कार्यक्रमात ३० देशांतील २३०० हून अधिक प्रदर्शक आणि ७५०० आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होत आहेत. 

सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार - बाबा रामदेवया कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बाबा रामदेव देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रयागराज महाकुंभाच्या आधी हा 'आहार कुंभ' आहे. आम्ही जगभरात भारताचे विचार, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीची विविधता प्रदर्शित करत आहोत आणि त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच, आम्ही 'फार्म टू फ्रीज' ही एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. यामध्ये आम्ही सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार आहेत. भारतातील आहार, विचार आणि वर्तनामुळे जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे बाबा रामदेव म्हणाले.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानfoodअन्नBaba Ramdevरामदेव बाबा