शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:31 IST

प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

नवी दिल्ली : चवीला सीमा लागत नाहीत. भारतीय पाककृतींमध्ये सीमा ओलांडण्याची ताकद आहे. आम्ही जगभरात आपली शेती आणि खाद्य निर्यात वाढवण्याच्या विचारांसह पुढे जात आहोत, असे केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले. इंडस फूड २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रक्रिया केलेले अन्न हे आपले भविष्य आहे. त्यांची वाढती मागणीच विकासासाठी प्रचंड शक्यता निर्माण करते. त्यामुळे तुमच्या जेवणाच्या विविध चवी जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जा आणि भारताच्या अनोख्या पाककृतींना जगातील अॅम्बेसिडर बनवा. प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

अन्न सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही निर्यातीला प्रोत्साहन देत १०० नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा (फूड टेस्टिंग लॅब) उघडणार आहोत. गेल्या काही वर्षांत, इंड्स फूड हे भारतातील सर्वोत्तम आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यापार प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले आहे, ज्यामुळे एफ अँड बी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले.

प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल - चिरागबदलत्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या कुटुंब रचनेमुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल आणि भविष्यातील हे लक्ष्य आहे. कारण त्यात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे चिराग पासवान म्हणाले. दरम्यान, या तीन दिवसांच्या इंडस फूड २०२५ कार्यक्रमात ३० देशांतील २३०० हून अधिक प्रदर्शक आणि ७५०० आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होत आहेत. 

सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार - बाबा रामदेवया कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बाबा रामदेव देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रयागराज महाकुंभाच्या आधी हा 'आहार कुंभ' आहे. आम्ही जगभरात भारताचे विचार, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीची विविधता प्रदर्शित करत आहोत आणि त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच, आम्ही 'फार्म टू फ्रीज' ही एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. यामध्ये आम्ही सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार आहेत. भारतातील आहार, विचार आणि वर्तनामुळे जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे बाबा रामदेव म्हणाले.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानfoodअन्नBaba Ramdevरामदेव बाबा