शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसमधून अचानक बेपत्ता झाले केंद्रीय मंत्री; तीन तास सुरु होता शोध, सकाळी दुसऱ्या स्टेशनवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:20 IST

केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे रेल्वे प्रवासातून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

Union Minister Jual Oraon Missing from Train: भारतीय रेल्वेत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा प्रवाशांची चूकामूक होण्याच्या घटना घडत असतात. मात्र रेल्वेतून केंद्रीय मंत्री बेपत्ता झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली असेल. केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे रेल्वे प्रवासातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम अचानक गोंडवाना एक्सप्रेसमधून गायब झाले. ते दिल्लीहून जबलपूरला जात होते. जुआल ओराम हे शेवटचे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना दिसला होते. त्यानंतर सकाळी जेव्हा ते बर्थवर नसल्याचे कळताच एकच गोंधळ उडाला.

केंद्रीय मंत्री जुआल ओराम हे शनिवारी ३ एप्रिल रोजी दिल्ली ते गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करत होते. रविवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास गाडीमध्य प्रदेशातील दमोह स्टेशनवर थांबली. त्याचवेळी जुआल ओराम यांची साखरेची पातळी कमी झाली आणि तो काहीतरी खाण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले. मात्र तितक्यात गाडी सुरू झाली. केंद्रीय मंत्र्‍यांनी गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. सुदैवाने ते प्लॅटफॉर्मवरच पडल्यामुळे त्यांना जास्त दुखापत झाली नाही.

दुसरीकडे,  केंद्रीय मंत्री जुआल ओराम यांच्या कर्मचाऱ्यांना या सगळ्या प्रकाराबाबत काहीच कल्पना नव्हती. गोंडवाना एक्सप्रेस निघाली आणि संपर्क क्रांती एक्सप्रेस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली. केंद्रीय मंत्री ओराम हे या ट्रेनमध्ये चढले. जेव्हा कर्मचाऱ्यांना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये त्यांची जागा  रिकामी आढळली तेव्हा सर्वांना धक्का बसला आणि शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती कळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले. ट्रेन आणि ट्रॅकवर सुमारे ३ तास ​​शोध मोहीम राबवण्यात आली. यानंतर सकाळी ७ वाजता जबलपूरच्या सिहोरा स्टेशनवर संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या बी३ कोचमध्ये जुआल ओराम भेटले. त्यांच्या हाताला आणि पायाला जखमा होत्या. प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना जबलपूरला आणण्यात आले. 

दरम्यान, ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात जन्मलेले ओरांव एका अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून आले आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द १९८९ मध्ये सुरू झाली. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर १९९० मध्ये बोनई विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन आमदार झाले. त्यानंतर, १९९८ मध्ये पहिल्यांदाच त्यांनी ओरांव सुंदरगड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली आणि तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने त्यांना १९९९ मध्ये आदिवासी व्यवहार मंत्री बनवले. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ओरांव यांना आदिवासी व्यवहार मंत्री बनवण्यात आले. पण त्यांच्यानंतर अर्जुन मुंडा यांनी पदभार स्विकारला. पुन्हा मोदी सरकारच्या ३.० केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा आदिवासी व्यवहार मंत्री बनवण्यात आले. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली