शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

केंद्रीय गृहसचिवांना मुदतीआधीच घरी पाठविले

By admin | Updated: September 1, 2015 02:27 IST

केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांना मुदतीआधीच ‘स्वेच्छानिवृत्ती’ देऊन त्यांच्या जागी राजीव महर्षी यांची, निवृत्तीच्या दिवशीच, दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांना मुदतीआधीच ‘स्वेच्छानिवृत्ती’ देऊन त्यांच्या जागी राजीव महर्षी यांची, निवृत्तीच्या दिवशीच, दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीने सोमवारी अचानक घडलेल्या या घडामोडींनी नोकरशाहीत खळबळ उडाली.गोयल यांचा दोन वर्षांचा सेवाकाळ संपायला १७ महिने शिल्लक होते. परंतु त्यांनी वैयक्तिक कारणांवरून केलेली स्वेच्छानिवृत्तीची विनंती मान्य करण्यात आल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत असले तरी त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावण्यात आली, असे मानले जात आहे. राजीव महर्षी सोमवारीच सेवानिवृत्त होणार होते. पण आता गृहसचिव नेमण्यात आल्याने ते पुढील दोन वर्षे सेवेत राहतील.गोयल यांना ‘इंडिया ट्रेड प्रमोशन आॅर्गनायजेशन’च्या (आयटीपीओ) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात येणार आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल. गोयल यांच्यासाठी लगोलग हे पद शोधण्यात आले ही बाबबी त्यांची स्वेच्छानिवृत्ती ही वास्तवात उचलबांगडी आहे, याकडे संकेत करणारी आहे. कार्यकाळ संपण्याच्या आधीच पदावरून हटविण्यात आलेले गोयल हे तिसरे नोकरशहा आहेत. याआधीचे गृह सचिव अनिल गोस्वामी आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना कार्यकाळ संपण्याच्या आधीच घरी पाठविण्यात आले होते.१९७८ च्या तुकडीतील राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी महर्षी यांच्या प्रभावाने दोन वर्षांसाठी असलेल्या नियुक्तीला पंतप्रधान मोदी यांनी मंजुरी दिली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. महर्षी हे सध्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाज विभागात सचिव आहेत. नोकरशाहीमध्ये महर्षी यांची नियुक्ती वित्तमंत्री अरुण जेटली यांचा व्यक्तिगत विजय मानला जात आहे. जेटली यांनीच महर्षी यांना राजस्थानमधून वित्त मंत्रालयात आणले होते.बरेच दिवसांची खदखदसन टीव्हीला सुरक्षा मंजुरी देण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवरून गोयल यांचा काही मंत्रालयांसोबत वाद सुरू होता. तसेच नागा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यावेळी पीएमओने गोयल यांना दुर्लक्षित केले होते. त्याचाही राग गोयल यांच्या मनात खदखदत होता, असे सूत्रांनी सांगितले. गोयल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. दोघेही केरळ कॅडरमधील आयएएस अधिकारी आहे. गोयल हे गृह सचिव असले तरी त्यांना बाजूला सारूनच अनेक निर्णय घेण्यात येत असल्याने त्यांनी आधी राजीनाम्याचा प्रस्ताव दिलेला होता. परंतु गृहमंत्री राजनाथसिंग यांनी त्यांची समजूत घातली आणि हा मुद्दा मिटला.