शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

केंद्र सरकारचा काटकसरीचा नारा

By admin | Updated: October 31, 2014 01:25 IST

सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता काटकसरीच्या धोरणाचा नारा दिला

नव्या नोक:या बंद : नोकरशहांच्या विदेश दौ:यावर र्निबध
नवी दिल्ली : सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता काटकसरीच्या धोरणाचा नारा दिला असून, एक वर्षापेक्षा जास्त काळ रिक्त असणा:या जागांवरील नोकरभरती ते नोकरशहांच्या पंचतारांकित हॉटेलमधील बैठकांर्पयत विविध गोष्टींना चाप लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी केली. 
महागाईस कारणीभूत ठरणा:या सरकारी तिजोरीतील वित्तीय तुटीच्या नियंत्रणासाठी सर्व पातळ्य़ांवर सुरू असलेल्या प्रयत्नाचाच हा एक भाग असल्याचे स्पष्ट करताना जेटली यांनी काही नेमक्या उपायोजना जाहीर केल्या आहेत. 
यानुसार, सरकारच्या ज्या विभागांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एखादे पद रिक्त असेल तर तिथे भर्ती करता येणार नाही. तसेच, ज्या विभागांनी पगार व भत्त्यांसदर्भात 33 टक्के बजेटचा टप्पा ओलांडला आहे, अशा विभागांना नवीन नोकरभरणा करता येणार
नाही. 
याचसोबत, सध्या नोकरशहांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार सरकारी कामासाठी देशात अथवा परदेशात प्रवास प्रथम श्रेणीने प्रवास करण्याची जी मुभा आहे, त्यालाही चाप लावण्यात आला आहे.
जेव्हा नोकरशहांना प्रवास करण्याची वेळ येईल तेव्हा सारासार विचार करून तो निर्णय घ्यावा असे स्पष्ट करतानाच अधिका:यांची बैठक असल्यास व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर प्रभावीपणो करण्यावर भर द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
तसेच या अधिका:यांना पंचतारांकित हॉटेलमधील बैठका घेण्यासही 
चाप लावण्यात आला 
आहे.
अधिकाधिक बैठका दालनात घ्याव्यात असे सुचित करण्यात आले आहे. तसेच, परदेशात बैठका आयोजित करण्यासही मनाई करण्यात आली आहे. याचसोबत, वाहन खरेदी करतानाही त्याचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. यातून केवळ संरक्षण क्षेत्र व तपास यंत्रणांना वगळण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तूट 4.1 टक्के राखण्याचे आव्हान
च्या उपाययोजना स्पष्ट करतानाच वित्तमंत्र्यांनी वित्तीय तुटीसंदर्भात ताजी आकडेवारीदेखील सादर केली. यानुसार, 2क्14-15 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.1 टक्के इतकी राखण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. तर, 2क्16-17 या आर्थिक वर्षार्पयत हीच तूट 3 टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 
 
च्काटकसरीचे धोरण काटेकोरपणो अवलंबले तर वित्तीय तुटीचा आकडा किमान क्.3 ते क्.6 टक्क्यार्पयत आटोक्यात येऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 
 
वित्तीय तुटीचे आव्हान मोठे आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची असल्याने ज्या अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, त्याचाच भाग म्हणून सरकारने काटकसरीच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना सादर केल्या आहेत. 
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री