शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

केंद्र सरकार गहाण टाकणार  6 लाख कोटींच्या मालमत्ता; अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 06:51 IST

अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा, रस्ते आणि रेल्वेवर योजनेमध्ये भर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना महामारीच्या फटक्यामुळे केंद्र सरकार आर्थ‍िक संकटाला तोंड देत आहे. वित्तीय तूट वाढत असून सरकारचा निर्गुंतवणुकीवर भर आहे. सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार रेल्वे, ऊर्जा, रस्ते इत्यादी क्षेत्रांमधील महत्त्वाच्या मालमत्ता खासगी क्षेत्रांना वापरण्यास देणार आहे. त्यातून तब्बल ६ लाख कोटी रुपये प्राप्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या २०२२ ते २०२५ या काळात एनएमपी योजना राबविली जाईल.

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिकृत घोषणा केली. ‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ (एनएमपी) योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या योजनेतून सरकारी मालमत्ता विकण्याचा घाट मोदी सरकारने घातल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकार या क्षेत्रांमध्ये पुढील ४ वर्षांमध्ये ही योजना राबविणार आहे.

महामार्ग आणि रेल्वेद्वारे सर्वाधिक उत्पन्नाची अपेक्षाराष्ट्रीय महामार्गांमधून १.६ लाख कोटी मिळतील, असा सरकारला अंदाज आहे. सुमारे ४०० रेल्वे स्थानके, ९० रेल्वे गाड्या, कोकण रेल्वे, रेल्वेची मैदाने यातून १.२ लाख कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय दूरसचांर क्षेत्र, नैसर्गिक वायू, विमानतळे, राष्ट्रीय मैदाने, निवासी वसाहती इत्यादींचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

४३ लाख कोटींच्यामालमत्तांची यादी तयारnसार्वजनिक मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली होती. n‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ योजनेचे सूतोवाचही त्यांनी केले होते. नीती आयोगाने आता या योजनेचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. या योजनेत एकूण ४३ लाख कोटींच्या मालमत्ता गहाण टाकण्यात येणार असून, आगामी ४ वर्षांत हे प्रमाण १४ टक्के राहणार आहे.n६ लाख कोटी रुपये मिळतील, इतक्या मालमत्तांची यादी सरकारने तयार केली आहे. त्यात रेल्वे, ऊर्जा, द्रुतगती महामार्ग, पॉवरग्रीड क्षेत्रातील मालमत्तांचा समावेश आहे. 

उद्देश काय?पायाभूत सुविधांचा विकास घडविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी सरकार व खाजगी क्षेत्राची सांगड घालण्यात येत आहे. विकास ध्येये गाठून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे.

कोणत्या क्षेत्रातील प्रकल्पांचे रोखीकरण करायचे हे ठरविण्यात आले आहे. मालमत्तांची मालकी सरकारकडेच राहील. तसेच मालमत्ता सरकारला परत करणेही बंधनकारक राहील. या योजनेद्वारे मालमत्ता ठरावीक कालावधीसाठी सरकारच्या ताब्यातून मुक्त होतील. खासगी क्षेत्रांना त्या वापरण्यास दिल्यामुळे सरकारला त्यातून उत्पन्न प्राप्त होईल; तसेच सरकारवरील कर्जही कमी होण्यास मदत होण्याची सरकारला अपक्षा आहे. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी