शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार गहाण टाकणार  6 लाख कोटींच्या मालमत्ता; अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 06:51 IST

अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा, रस्ते आणि रेल्वेवर योजनेमध्ये भर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना महामारीच्या फटक्यामुळे केंद्र सरकार आर्थ‍िक संकटाला तोंड देत आहे. वित्तीय तूट वाढत असून सरकारचा निर्गुंतवणुकीवर भर आहे. सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार रेल्वे, ऊर्जा, रस्ते इत्यादी क्षेत्रांमधील महत्त्वाच्या मालमत्ता खासगी क्षेत्रांना वापरण्यास देणार आहे. त्यातून तब्बल ६ लाख कोटी रुपये प्राप्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या २०२२ ते २०२५ या काळात एनएमपी योजना राबविली जाईल.

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिकृत घोषणा केली. ‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ (एनएमपी) योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या योजनेतून सरकारी मालमत्ता विकण्याचा घाट मोदी सरकारने घातल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकार या क्षेत्रांमध्ये पुढील ४ वर्षांमध्ये ही योजना राबविणार आहे.

महामार्ग आणि रेल्वेद्वारे सर्वाधिक उत्पन्नाची अपेक्षाराष्ट्रीय महामार्गांमधून १.६ लाख कोटी मिळतील, असा सरकारला अंदाज आहे. सुमारे ४०० रेल्वे स्थानके, ९० रेल्वे गाड्या, कोकण रेल्वे, रेल्वेची मैदाने यातून १.२ लाख कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय दूरसचांर क्षेत्र, नैसर्गिक वायू, विमानतळे, राष्ट्रीय मैदाने, निवासी वसाहती इत्यादींचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

४३ लाख कोटींच्यामालमत्तांची यादी तयारnसार्वजनिक मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली होती. n‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ योजनेचे सूतोवाचही त्यांनी केले होते. नीती आयोगाने आता या योजनेचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. या योजनेत एकूण ४३ लाख कोटींच्या मालमत्ता गहाण टाकण्यात येणार असून, आगामी ४ वर्षांत हे प्रमाण १४ टक्के राहणार आहे.n६ लाख कोटी रुपये मिळतील, इतक्या मालमत्तांची यादी सरकारने तयार केली आहे. त्यात रेल्वे, ऊर्जा, द्रुतगती महामार्ग, पॉवरग्रीड क्षेत्रातील मालमत्तांचा समावेश आहे. 

उद्देश काय?पायाभूत सुविधांचा विकास घडविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी सरकार व खाजगी क्षेत्राची सांगड घालण्यात येत आहे. विकास ध्येये गाठून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे.

कोणत्या क्षेत्रातील प्रकल्पांचे रोखीकरण करायचे हे ठरविण्यात आले आहे. मालमत्तांची मालकी सरकारकडेच राहील. तसेच मालमत्ता सरकारला परत करणेही बंधनकारक राहील. या योजनेद्वारे मालमत्ता ठरावीक कालावधीसाठी सरकारच्या ताब्यातून मुक्त होतील. खासगी क्षेत्रांना त्या वापरण्यास दिल्यामुळे सरकारला त्यातून उत्पन्न प्राप्त होईल; तसेच सरकारवरील कर्जही कमी होण्यास मदत होण्याची सरकारला अपक्षा आहे. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी