शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

केंद्र सरकार गहाण टाकणार  6 लाख कोटींच्या मालमत्ता; अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 06:51 IST

अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा, रस्ते आणि रेल्वेवर योजनेमध्ये भर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना महामारीच्या फटक्यामुळे केंद्र सरकार आर्थ‍िक संकटाला तोंड देत आहे. वित्तीय तूट वाढत असून सरकारचा निर्गुंतवणुकीवर भर आहे. सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार रेल्वे, ऊर्जा, रस्ते इत्यादी क्षेत्रांमधील महत्त्वाच्या मालमत्ता खासगी क्षेत्रांना वापरण्यास देणार आहे. त्यातून तब्बल ६ लाख कोटी रुपये प्राप्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या २०२२ ते २०२५ या काळात एनएमपी योजना राबविली जाईल.

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अधिकृत घोषणा केली. ‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ (एनएमपी) योजनेअंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या योजनेतून सरकारी मालमत्ता विकण्याचा घाट मोदी सरकारने घातल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकार या क्षेत्रांमध्ये पुढील ४ वर्षांमध्ये ही योजना राबविणार आहे.

महामार्ग आणि रेल्वेद्वारे सर्वाधिक उत्पन्नाची अपेक्षाराष्ट्रीय महामार्गांमधून १.६ लाख कोटी मिळतील, असा सरकारला अंदाज आहे. सुमारे ४०० रेल्वे स्थानके, ९० रेल्वे गाड्या, कोकण रेल्वे, रेल्वेची मैदाने यातून १.२ लाख कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय दूरसचांर क्षेत्र, नैसर्गिक वायू, विमानतळे, राष्ट्रीय मैदाने, निवासी वसाहती इत्यादींचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

४३ लाख कोटींच्यामालमत्तांची यादी तयारnसार्वजनिक मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली होती. n‘राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन’ योजनेचे सूतोवाचही त्यांनी केले होते. नीती आयोगाने आता या योजनेचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. या योजनेत एकूण ४३ लाख कोटींच्या मालमत्ता गहाण टाकण्यात येणार असून, आगामी ४ वर्षांत हे प्रमाण १४ टक्के राहणार आहे.n६ लाख कोटी रुपये मिळतील, इतक्या मालमत्तांची यादी सरकारने तयार केली आहे. त्यात रेल्वे, ऊर्जा, द्रुतगती महामार्ग, पॉवरग्रीड क्षेत्रातील मालमत्तांचा समावेश आहे. 

उद्देश काय?पायाभूत सुविधांचा विकास घडविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी सरकार व खाजगी क्षेत्राची सांगड घालण्यात येत आहे. विकास ध्येये गाठून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे.

कोणत्या क्षेत्रातील प्रकल्पांचे रोखीकरण करायचे हे ठरविण्यात आले आहे. मालमत्तांची मालकी सरकारकडेच राहील. तसेच मालमत्ता सरकारला परत करणेही बंधनकारक राहील. या योजनेद्वारे मालमत्ता ठरावीक कालावधीसाठी सरकारच्या ताब्यातून मुक्त होतील. खासगी क्षेत्रांना त्या वापरण्यास दिल्यामुळे सरकारला त्यातून उत्पन्न प्राप्त होईल; तसेच सरकारवरील कर्जही कमी होण्यास मदत होण्याची सरकारला अपक्षा आहे. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी