शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

BREAKING: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न; मोदी सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 20:12 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी कर्पुरी ठाकूर यांची १०० वी जयंती असून, या पूर्वसंध्येला सरकारने ही मोठी घोषणा केली. जनता दल युनायटेडने (JDU) कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. ठाकूर यांना भारतरत्न मिळणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून देण्यात आली. सरकारच्या या निर्णयानंतर जदयूने मोदी सरकारचे आभार मानले.  

कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आम्हाला ३६ वर्षांच्या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या १५ कोटी जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानू इच्छितो.

कोण होते कर्पुरी ठाकूर?बिहारचे जननायक म्हणून कर्पुरी ठाकूर यांची ओळख होती. कर्पुरी ठाकूर १९७० च्या दशकात दोनदा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्रीही होते. स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच शिक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. मागासलेल्या समाजातून आलेला नेता म्हणून त्यांनी जनतेच्या मनात घर केले. मंडल आंदोलनापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. 

२४ जानेवारी १९२४ रोजी जन्मलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची ओळख स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि ज्येष्ठ समाजवादी राजकारणी अशी राहिली. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. तसेच उपमुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्ष नेते अशी विविध पदेही भूषवली होती. त्याबरोबरच १९५२ साली पहिल्यांदा आमदार बनल्यानंतर ते दीर्घ राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभूत झाले नव्हते. आजच्या बिहारच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जाणारे लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील कुमार मोदी हे त्यांचे शिष्य आणि राजकीय राजकीय वारसदार मानले जातात.

१९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार...एक लढवय्या नेता म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी १९५२ मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून विजयी होऊन प्रथमच आमदार होण्याचा मान पटकावला. १९६७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत युनायटेड सोशलिस्ट पार्टी कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आली. याचा परिणाम राज्यातील सत्तेवरही झाला अन् काँग्रेसला जनतेने नाकारले. तेव्हा बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :BiharबिहारBharat Ratnaभारतरत्न