शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्पेक्ट्रममुळे केंद्र सरकार मालामाल; ७७ हजार कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 06:31 IST

एअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाच वर्षांनी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात केंद्र सरकार मालामाल झाले आहे. सरकारने स्पेक्ट्रम विकून ७७ हजार ८१४ कोटींची कमाई केली आहे. सर्वाधिक स्पेक्ट्रम रिलायन्स जिओने खरेदी केले आहेत. लिलावात ५जी स्पेक्ट्रम विक्रीसाठी उपलब्ध केले नव्हते.

८५५.६० मेगाहर्ट्झपर्यंत स्पेक्ट्रम दोन दिवसांत विकले गेले. जिओने सर्वाधिक ५७,१२२ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले. व्होडाफोन-आयडियाने १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली होती. भारती एअरटेलने १८ हजार ६९९ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम विकत घेतले. लिलावात ८००, ९००, १८००, २१०० व २३०० मेगाहर्ट्झ बँडसाठी बोली लावण्यात आली. मात्र, ७०० व २५०० मेगाहर्ट्झ बँडसाठी कोणीच बोली लावली नाही. गेल्या वेळी ७०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकले गेले नव्हते. यंदाही तसेच झाले. हा स्पेक्ट्रम ३.५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसोबत जोडला आहे. भविष्यात भारताला डिजिटल क्षेत्रातील आघाडीच्या देशांमध्ये समाविष्ट करण्यासाठी तो उपयोगी ठरू शकतो.  त्यामुळे या स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक आरक्षित मूल्य ठेवले होते.

गीगाहर्ट्झ बँडच्या खालील इतर स्पेक्ट्रम कमी किमतींत उपलब्ध आहेत. नव्या स्पेक्ट्रमसाठी बहुतांश ऑपरेटर्स इच्छुक दिसले नाहीत, कारण नव्या स्पेक्ट्रमसाठी उपकरणे अद्ययावत करावी लागतील आणि तो खर्च वाढेल. २२५० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी सोमवारी लिलाव सुरू झाले होते. त्याचे आरक्षित मूल्य चार लाख कोटी रुपये होते. सरकारी कंपन्यांचा सहभाग नाही.बीएसएनएल व एमटीएनएल यांचा लिलावात सहभाग नव्हता.  सरकारी स्पेक्ट्रमच्या लिलावात या कंपन्यांचे सहभागी होणे हितसंबंधांमध्ये अडथळा ठरले असते, असे सरकारचे म्हणणे आहे. 

५ जीसाठी वापर शक्यएअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

सर्वाधिक ‘जिओ’कडे स्पेक्ट्रम वाढविल्यामुळे डिजिटल सेवेचा विस्तार करण्यास मदत हाेणार आहे. तसेच अतिरिक्त स्पेक्ट्रममुळे ‘५जी’ सेवा देण्यासाठी सज्ज झाल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सकडे आता एकूण १७१७ मेगाहर्टझ स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहे.

४जी कव्हरेज सुधारण्यासाठी वापरव्होडाफोन-आयडियाने पाच सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यांचा वापर ४जी कव्हरेजमध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार