शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:36 IST

लवकरच निर्णय अपेक्षित : महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना नाताळच्या तोंडावर वा नववर्षाच्या आधी आनंदाची बातमी मिळायची शक्यता आहे. मोदी सरकार या कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या कर्मचाºयांचा पगार किमान ७५0 रुपये ते कमाल १0 हजार रुपयांनी वाढू शकेल.

एका अर्थविषयक वृत्तवाहिनीने महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे वृत्त दिले आहे. हे खरे ठरल्यास केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाºयांना नववर्षाची मोठीच भेट ठरू शकेल. काहींच्या मते नाताळच्या आधी ही घोषणा केली जाईल, तर काहींनी नववर्ष सुरू होण्याआधी महागाई भत्त्यातील वाढीचा निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.जुलै २0१९ ते डिसेंबर २0१९ या काळात महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाईल, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाºयानेही व्यक्त केली. मात्र ४ टक्के वाढ केली तर त्याचा तिजोरीवर खूपच मोठा बोजा येऊ शकेल. त्यामुळे प्रत्यक्ष महागाईत किती वाढ झाली, हे पाहून भत्त्यात वाढ होईल, असे हा अधिकारी म्हणाला.

गेल्या काही महिन्यांपासून देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. वस्तू व मालाला उठाव नाही, त्यामुळे उत्पादन कमी होत आहे, परिणामी लोकांचे रोजगार जात आहेत. अशा स्थितीत वस्तू व मालाला उठाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या हाती अधिक पैसा आला, तर मागणी वाढेल आणि उत्पादन तसेच रोजगार यांत वाढ होईल, या हेतूने सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र त्याचबरोबर जीएसटीच्या महसुलात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही, हीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारांना आॅगस्टपासून भरपाईची रक्कम मिळालेली नाही. महाराष्ट्रालाच १५ हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळायचे आहेत. अन्य राज्यांची स्थितीही अशीच आहे. दोन दिवसांनी होणाºया जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्यांचे अर्थमंत्री यावर आवाज उठवतील, असे समजते. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीच्या टप्प्यात बदल न करता करवाढीचे संकेत दिले आहेत.करवाढ अपरिहार्यमात्र केंद्राचा महसूल कमी होत असताना वाढीव महागाई भत्त्याचा बोजा सरकार कसा सहन करणार, हा प्रश्न आहे. फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प मांडताना त्यामुळे अर्थमंत्र्यांची तारांबळ उडेल, असे दिसत आहे. त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवी करवाढ अर्थसंकल्पाद्वारे करतील, असे दिसते.