शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:31 IST

Ayodhya Ram Mandir: केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा एक ठराव बैठकीत पारित केला.

Ayodhya Ram Mandir: ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. या सोहळ्याचे जगभरात कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आला. सर्व मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.

देशाचे मनोबल आणि 'सांस्कृतिक आत्मविश्वास' वाढवून 'नव्या युगाची सुरुवात' केल्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 'लोकांचा नायक' म्हणून पंतप्रधान मोदी यांचे झालेले स्वागत, ही एक अभूतपूर्व विकासाची सुरुवात असल्याची भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, पंतप्रधान महोदय, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे भारतीय सभ्यतेचे ५०० वर्षे जुने स्वप्न पूर्ण करण्याचे प्रतीक आहे. १९४७ मध्ये देशाला शरीररुपाने स्वातंत्र्य मिळाले, पण राम मंदिरामुळे आत्मा मिळाला आहे.

या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली

अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा अधिक भावनिक होता. आणीबाणीला विरोध करण्यासाठी लोकांनी दाखविलेल्या एकजुटीचाप्रमाणे या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली. प्रभू श्रीरामाची लोकप्रियता ही एका नव्या युगाची नांदी आहे. लोकांनी शतकानुशतके वाट पाहिली. याचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे, जी एक राष्ट्रीय कथा बनली. राम मंदिर आंदोलन हा स्वातंत्र्यानंतरचा एकमेव असा टप्पा आहे, ज्याने भारतीयांना एकत्र केले. त्याच वेळी, उत्सवाचे वातावरण, रस्त्यावरील भावनांचे प्रतिबिंब राम मंदिर आंदोलनाचे पूर्णत्व दर्शवते. 

राम मंदिरामुळे देशाला आत्मा मिळाला

केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. परंतु २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते अद्वितीय आहे. कारण ते शतकांच्या प्रतीक्षेनंतर ते मिळाले आहे. खरे तर आपण असे म्हणू शकतो की देशाला शरीररुपाने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण आता त्याचा आत्मा सापडला आहे. आपल्या सर्वांसाठी ते आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक आहे. अयोध्येतील पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देताना, जिथे त्यांनी राम हे भारताचे सार म्हणून वर्णन केले होते, त्या ठरावात म्हटले आहे की, नियतीने भारताच्या शाश्वत सनातन संस्कृतीचा पाया आणि त्याच्या जागतिक प्रभावाचा पाया असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी