शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:31 IST

Ayodhya Ram Mandir: केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा एक ठराव बैठकीत पारित केला.

Ayodhya Ram Mandir: ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. या सोहळ्याचे जगभरात कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आला. सर्व मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.

देशाचे मनोबल आणि 'सांस्कृतिक आत्मविश्वास' वाढवून 'नव्या युगाची सुरुवात' केल्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 'लोकांचा नायक' म्हणून पंतप्रधान मोदी यांचे झालेले स्वागत, ही एक अभूतपूर्व विकासाची सुरुवात असल्याची भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, पंतप्रधान महोदय, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे भारतीय सभ्यतेचे ५०० वर्षे जुने स्वप्न पूर्ण करण्याचे प्रतीक आहे. १९४७ मध्ये देशाला शरीररुपाने स्वातंत्र्य मिळाले, पण राम मंदिरामुळे आत्मा मिळाला आहे.

या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली

अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा अधिक भावनिक होता. आणीबाणीला विरोध करण्यासाठी लोकांनी दाखविलेल्या एकजुटीचाप्रमाणे या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली. प्रभू श्रीरामाची लोकप्रियता ही एका नव्या युगाची नांदी आहे. लोकांनी शतकानुशतके वाट पाहिली. याचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे, जी एक राष्ट्रीय कथा बनली. राम मंदिर आंदोलन हा स्वातंत्र्यानंतरचा एकमेव असा टप्पा आहे, ज्याने भारतीयांना एकत्र केले. त्याच वेळी, उत्सवाचे वातावरण, रस्त्यावरील भावनांचे प्रतिबिंब राम मंदिर आंदोलनाचे पूर्णत्व दर्शवते. 

राम मंदिरामुळे देशाला आत्मा मिळाला

केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. परंतु २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते अद्वितीय आहे. कारण ते शतकांच्या प्रतीक्षेनंतर ते मिळाले आहे. खरे तर आपण असे म्हणू शकतो की देशाला शरीररुपाने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण आता त्याचा आत्मा सापडला आहे. आपल्या सर्वांसाठी ते आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक आहे. अयोध्येतील पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देताना, जिथे त्यांनी राम हे भारताचे सार म्हणून वर्णन केले होते, त्या ठरावात म्हटले आहे की, नियतीने भारताच्या शाश्वत सनातन संस्कृतीचा पाया आणि त्याच्या जागतिक प्रभावाचा पाया असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी