शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:31 IST

Ayodhya Ram Mandir: केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा एक ठराव बैठकीत पारित केला.

Ayodhya Ram Mandir: ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. या सोहळ्याचे जगभरात कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आला. सर्व मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.

देशाचे मनोबल आणि 'सांस्कृतिक आत्मविश्वास' वाढवून 'नव्या युगाची सुरुवात' केल्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 'लोकांचा नायक' म्हणून पंतप्रधान मोदी यांचे झालेले स्वागत, ही एक अभूतपूर्व विकासाची सुरुवात असल्याची भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, पंतप्रधान महोदय, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे भारतीय सभ्यतेचे ५०० वर्षे जुने स्वप्न पूर्ण करण्याचे प्रतीक आहे. १९४७ मध्ये देशाला शरीररुपाने स्वातंत्र्य मिळाले, पण राम मंदिरामुळे आत्मा मिळाला आहे.

या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली

अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा अधिक भावनिक होता. आणीबाणीला विरोध करण्यासाठी लोकांनी दाखविलेल्या एकजुटीचाप्रमाणे या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली. प्रभू श्रीरामाची लोकप्रियता ही एका नव्या युगाची नांदी आहे. लोकांनी शतकानुशतके वाट पाहिली. याचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे, जी एक राष्ट्रीय कथा बनली. राम मंदिर आंदोलन हा स्वातंत्र्यानंतरचा एकमेव असा टप्पा आहे, ज्याने भारतीयांना एकत्र केले. त्याच वेळी, उत्सवाचे वातावरण, रस्त्यावरील भावनांचे प्रतिबिंब राम मंदिर आंदोलनाचे पूर्णत्व दर्शवते. 

राम मंदिरामुळे देशाला आत्मा मिळाला

केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. परंतु २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते अद्वितीय आहे. कारण ते शतकांच्या प्रतीक्षेनंतर ते मिळाले आहे. खरे तर आपण असे म्हणू शकतो की देशाला शरीररुपाने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण आता त्याचा आत्मा सापडला आहे. आपल्या सर्वांसाठी ते आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक आहे. अयोध्येतील पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देताना, जिथे त्यांनी राम हे भारताचे सार म्हणून वर्णन केले होते, त्या ठरावात म्हटले आहे की, नियतीने भारताच्या शाश्वत सनातन संस्कृतीचा पाया आणि त्याच्या जागतिक प्रभावाचा पाया असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी