शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

देश शरीररुपाने १९४७ला स्वतंत्र झाला, राम मंदिरामुळे आत्मा मिळाला; PM मोदींचे तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:31 IST

Ayodhya Ram Mandir: केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा एक ठराव बैठकीत पारित केला.

Ayodhya Ram Mandir: ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. या सोहळ्याचे जगभरात कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आला. सर्व मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.

देशाचे मनोबल आणि 'सांस्कृतिक आत्मविश्वास' वाढवून 'नव्या युगाची सुरुवात' केल्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 'लोकांचा नायक' म्हणून पंतप्रधान मोदी यांचे झालेले स्वागत, ही एक अभूतपूर्व विकासाची सुरुवात असल्याची भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, पंतप्रधान महोदय, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे भारतीय सभ्यतेचे ५०० वर्षे जुने स्वप्न पूर्ण करण्याचे प्रतीक आहे. १९४७ मध्ये देशाला शरीररुपाने स्वातंत्र्य मिळाले, पण राम मंदिरामुळे आत्मा मिळाला आहे.

या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली

अयोध्येतील २२ जानेवारीचा सोहळा अधिक भावनिक होता. आणीबाणीला विरोध करण्यासाठी लोकांनी दाखविलेल्या एकजुटीचाप्रमाणे या सोहळ्यासाठीही देशवासीयांनी एकजूट दाखवली. प्रभू श्रीरामाची लोकप्रियता ही एका नव्या युगाची नांदी आहे. लोकांनी शतकानुशतके वाट पाहिली. याचे जनआंदोलनात रूपांतर झाले आहे, जी एक राष्ट्रीय कथा बनली. राम मंदिर आंदोलन हा स्वातंत्र्यानंतरचा एकमेव असा टप्पा आहे, ज्याने भारतीयांना एकत्र केले. त्याच वेळी, उत्सवाचे वातावरण, रस्त्यावरील भावनांचे प्रतिबिंब राम मंदिर आंदोलनाचे पूर्णत्व दर्शवते. 

राम मंदिरामुळे देशाला आत्मा मिळाला

केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. परंतु २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते अद्वितीय आहे. कारण ते शतकांच्या प्रतीक्षेनंतर ते मिळाले आहे. खरे तर आपण असे म्हणू शकतो की देशाला शरीररुपाने १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण आता त्याचा आत्मा सापडला आहे. आपल्या सर्वांसाठी ते आध्यात्मिक आनंदाचे प्रतीक आहे. अयोध्येतील पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देताना, जिथे त्यांनी राम हे भारताचे सार म्हणून वर्णन केले होते, त्या ठरावात म्हटले आहे की, नियतीने भारताच्या शाश्वत सनातन संस्कृतीचा पाया आणि त्याच्या जागतिक प्रभावाचा पाया असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी