शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:04 IST

मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार लवकरात लवकर नियंत्रणात आणला पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून रोजी अमेरिका व इजिप्तच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आणि सरकारला कळवला असल्याचे समजते. मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अनेक घरांचे नुकसान झाले आहे व ५० हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. भाजपसह कुकी आमदारांनी या हिंसाचारात राज्य पोलिस दोषी असल्याचा आरोप केला आहे. या भागात वर्चस्व असलेल्या मैतेईंचे म्हणणे आहे की, आसाम रायफल्स कुकी बंडखोरांना मदत करीत आहेत. मोदी सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, नऊ वर्षांत पंतप्रधानांनी कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही.

प. बंगालमधील हिंसाचारानंतर सरकार बरखास्त करण्याचा दबाव होता. परंतु सरकारने सरकार बरखास्त करण्यासाठी कलम ३५६चा वापर केला नाही. मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्यास मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह असमर्थ ठरत असल्यामुळे त्यांना कायम ठेवण्याबाबत भाजप द्विधा मन:स्थितीत आहे.

मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे : राहुल गांधीपंतप्रधान मोदी देशात नसताना मणिपूर मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. यावरून त्यांच्यासाठी (मोदी) मणिपूरचा मुद्दा महत्वाचा नाही हे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार