शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

केंद्र मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:04 IST

मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचार लवकरात लवकर नियंत्रणात आणला पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून रोजी अमेरिका व इजिप्तच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आणि सरकारला कळवला असल्याचे समजते. मागील ५० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अनेक घरांचे नुकसान झाले आहे व ५० हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. भाजपसह कुकी आमदारांनी या हिंसाचारात राज्य पोलिस दोषी असल्याचा आरोप केला आहे. या भागात वर्चस्व असलेल्या मैतेईंचे म्हणणे आहे की, आसाम रायफल्स कुकी बंडखोरांना मदत करीत आहेत. मोदी सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, नऊ वर्षांत पंतप्रधानांनी कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही.

प. बंगालमधील हिंसाचारानंतर सरकार बरखास्त करण्याचा दबाव होता. परंतु सरकारने सरकार बरखास्त करण्यासाठी कलम ३५६चा वापर केला नाही. मणिपूरमधील स्थिती नियंत्रणात आणण्यास मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह असमर्थ ठरत असल्यामुळे त्यांना कायम ठेवण्याबाबत भाजप द्विधा मन:स्थितीत आहे.

मणिपूर ५० दिवसांपासून जळत आहे : राहुल गांधीपंतप्रधान मोदी देशात नसताना मणिपूर मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. यावरून त्यांच्यासाठी (मोदी) मणिपूरचा मुद्दा महत्वाचा नाही हे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार