शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रश्नावरून केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष; गृहमंत्रालयाला पत्र लिहीत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 19:35 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते.

Farmers Protest ( Marathi News ) :शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले शेतकरी दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहीत केंद्राच्या या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. "राज्य सरकार हे शंभू आणि धाबी-गुर्जन सीमेवर शेतकऱ्यांना जमण्यास सहकार्य करत आहे, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. हे आंदोलन दिल्लीत करावं, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. मात्र हालचालींवर निर्बंध असल्याने ते पंजाब आणि हरियाणा सीमेवर थांबले आहेत," असं पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.

पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी पुढे म्हटलं आहे की, "हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आतापर्यंत १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतरही पंजाब सरकारने अत्यंत जबाबदारीने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणं गरजेचं आहे."

शेतकरी नेत्यांचा सरकारला इशारा

"शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये," असं शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारPunjabपंजाब