शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी प्रश्नावरून केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष; गृहमंत्रालयाला पत्र लिहीत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 19:35 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते.

Farmers Protest ( Marathi News ) :शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले शेतकरी दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहीत केंद्राच्या या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. "राज्य सरकार हे शंभू आणि धाबी-गुर्जन सीमेवर शेतकऱ्यांना जमण्यास सहकार्य करत आहे, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. हे आंदोलन दिल्लीत करावं, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. मात्र हालचालींवर निर्बंध असल्याने ते पंजाब आणि हरियाणा सीमेवर थांबले आहेत," असं पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.

पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी पुढे म्हटलं आहे की, "हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आतापर्यंत १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतरही पंजाब सरकारने अत्यंत जबाबदारीने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणं गरजेचं आहे."

शेतकरी नेत्यांचा सरकारला इशारा

"शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये," असं शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारPunjabपंजाब