शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकरी प्रश्नावरून केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष; गृहमंत्रालयाला पत्र लिहीत दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 19:35 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते.

Farmers Protest ( Marathi News ) :शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले शेतकरी दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पंजाब सरकारला कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहीत केंद्राच्या या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. "राज्य सरकार हे शंभू आणि धाबी-गुर्जन सीमेवर शेतकऱ्यांना जमण्यास सहकार्य करत आहे, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. हे आंदोलन दिल्लीत करावं, अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. मात्र हालचालींवर निर्बंध असल्याने ते पंजाब आणि हरियाणा सीमेवर थांबले आहेत," असं पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.

पंजाब सरकारची बाजू मांडताना मुख्य सचिवांनी पुढे म्हटलं आहे की, "हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आतापर्यंत १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतरही पंजाब सरकारने अत्यंत जबाबदारीने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणं गरजेचं आहे."

शेतकरी नेत्यांचा सरकारला इशारा

"शेतकरी संयमी आहेत, पण आमच्या संयमाचा अंत पाहू नका. देशाने वाईट चित्र पाहू नये, अशी आमची इच्छा आहे. आमचा हेतू अराजकता माजवण्याचा नाही. आम्हाला रोखण्यासाठी एवढे मोठे बॅरिकेड्स लावले, हे योग्य नाही. आम्हाला शांततेने दिल्लीला जायचे आहे. सरकारने बॅरिकेड्स काढून आम्हाला आत येऊ द्यावे, अन्यथा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही शांतताप्रिय आहोत, त्यांनी एक हात पुढे केला तर आम्हीही सहकार्य करू. आम्हाला संयमाने परिस्थिती हाताळायची आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी नियंत्रण गमावू नये," असं शेतकरी नेते जगजितसिंग डड्डेवाल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारPunjabपंजाब