शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रामध्ये फेरबदल?

By admin | Updated: March 15, 2017 04:40 IST

आसामात सर्वानंद सोनोवाल आणि गोव्यात मनोहर पर्रीकर या दोन केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड

नवी दिल्ली : आसामात सर्वानंद सोनोवाल आणि गोव्यात मनोहर पर्रीकर या दोन केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवल्यानंतर आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांतही मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री व खासदारांची नावे पुढे आली असून, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतरच हे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्री करण्याची चर्चा दिल्लीत सुरू होती. पण उत्तम काम करणाऱ्या आणि राज्यावर पकड बसवलेल्या फडणवीस यांना महाराष्ट्रातून हलवू नये, असे अखेर ठरल्याचे समजते.सर्वानंद सोनोवाल यांच्यानंतर गोव्यात पर्रीकर यांना पाठवण्याची वेळ भाजपावर आली आणि आता पुन्हा दोन मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री व खासदार यांचीच नावे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सर्वांत पुढे असून, त्यांच्या नावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रा. स्व. संघाच्या नेत्यांशी अमित शाह चर्चा करतील आणि राजनाथ सिंह यांचे नाव जाहीर केले जाईल, अशी चर्चा लखनऊमध्येही सुरू आहे. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांचे नाव आघाडीवर आहे. पर्रीकर यांच्यानंतर राजनाथ सिंह वा मनोज सिन्हा यांना राज्यात पाठवल्यास केंद्रात बदल करणे अपरिहार्य आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळात सतत बदल होणे योग्य नाही, असे संघ नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी एखाद्या वेगळ्याच नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी नक्की करतील, असे कळते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मीदेखील फक्त ऐकतोय‘तुम्ही ऐकताय तसेच मीही ती अटकळ ऐकतोय, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीला जाणार असल्याची अफवा फेटाळून लावली. संरक्षण मंत्रीपदाचा मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रात फेरबदल होणार असून, त्यात फडणवीस यांना बोलावले जाईल आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी अफवा दोन दिवसांपासून जोरात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी विकासाचे अनेक निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वात सरकारची घडी नीट बसत असताना त्यांना दिल्लीला हलविले जाण्याची शक्यता नाही. यूपीत कोण जाणार? : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून जाण्यात खा. योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष खासदार केशव प्रसाद मौर्य यांनाही रस आहे. पण पक्षाच्या ३१२ आमदारांना डावलून मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्री वा खासदाराला पाठवावे का, हा सवाल भाजपापुढे आहे.उत्तराखंडातही पेचउत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून भगतसिंग कौशियारी, बी. सी. खंडुरी, रमेश पोखरियाल निशंक व सत्पाल महाराज यांची नावे घेतली जात आहेत. हे सारे खासदार आहेत. खासदार वा केंद्रीय मंत्र्यांना राज्यात पाठविल्यास लोकसभा व विधानसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागेल. ती टाळण्याची अनेकांची इच्छा आहे. यांची नावे चर्चेतदोन्ही राज्यांत एखाद्या आमदारालाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी पक्षात होत आहे. यूपीत सतीश महाना व सुरेश खत्री या जुन्या नेत्यांचा तर उत्तराखंडमध्ये देवेंद्रसिंग रावत व प्रकाश पंत या आमदारांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार सुरू असल्याचे कळते. अखेर मौर्यच? : भाजपा नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत केशव प्रसाद मौर्य हेच नाव योग्य ठरेल, अशी चर्चा झाली. मौर्य ओबीसी समाजाचे असून, संघ नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. ते संघाचे जुने कार्यकर्ते आहेत.