शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सरकारी वकिलाचा आरोप केंद्राने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 23:29 IST

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविषयी ‘सौम्य’ भूमिका घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी

नवी दिल्ली : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविषयी ‘सौम्य’ भूमिका घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केलेला आरोप केंद्र सरकार आणि राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावला.‘सरकारी वकिलाला आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यास सांगण्यात आल्याचा मुख्य आरोप आहे. मी स्वत: याबाबतची कागदपत्रे तपासली आहेत. या आरोपात काहीही तथ्य नाही,’ असे केंद्रीय गृहमंत्रालय आणि एनआयएच्या वतीने युक्तिवाद करणारे अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यासाठी सरकारकडून सालियन यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या जनहित याचिकेवर सरकार आणि एनआयएच्या वतीने प्रति-प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास एक आठवड्याची मुदत देण्याची विनंती रोहतगी यांनी यावेळी केला. गेल्या ११ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या जनहित याचिकेवरून केंद्र व एनआयएला नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)सामाजिक कार्यकर्ते हर्ष मांदेर यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. आरोपींविषयी सौम्य भूमिका घेण्यासाठी विशेष सरकारी वकिलावर दबाव टाकून केंद्र व एनआयए सरकारी वकिलाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहेत. एकप्रकारे कार्यपालिका ही न्यायपालिकेवर प्रभाव टाकत आहे, असा आरोप या याचिकेत केला आहे. या आरोपानंतर सालियन यांना एनआयएने आपल्या विशेष सरकारी वकिलाच्या पॅनलमधून वगळले होते. या मालेगाव बॉम्बस्फोटात लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हे प्रमुख आरोपी आहेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीत झालेल्या या बॉम्बस्फोटात ४ जण ठार आणि ७९ जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)