शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

देशभरात शांततेत स्वातंत्र्यदिन साजरा, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिला विकासाचा नारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 06:06 IST

देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्तात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

नवी दिल्ली : देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्तात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण आणि पथसंचलन पार पडले. निमलष्कर दलांसह विविध सुरक्षा दलांचा कार्यक्रमांमध्ये सहभाग होता.राज्य पातळीवरील ध्वजारोहणानंतर त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिक मुद्यांना भाषणांमध्ये प्राधान्य देतानाच विशेषत: सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधले. कलम ३७१ (एच) नुसार अरुणाचल प्रदेशला देण्यात आलेल्या सुविधा कायम राहतील, असे आश्वासन केंद्र सरकारने संसदेत दिल्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी इटानगर येथील इंदिरा गांधी पार्कमध्ये ध्वजारोहणानंतर भाषणात नमूद केले. सिक्किमला ३७१ (एफ) नुसार विशेष दर्जा देण्यात आला असून तो कायम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी म्हटले. मिझोराम आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी प्रगती आणि विकासाकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राष्टÑीय नागरिक नोंदणीसंबंधी भूमिकेचे समर्थन करतानाच भूमिहीन कुटुंबांना जमिनीचा अधिकार बहाल करण्यासाठी लवकरच नवे धोरण आणणार असल्याचे सांगितले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी फोन करून सरकारबाबत मते जाणून घेणार असल्याची माहिती दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘न्याय के साथ विकास’ आणि सांप्रदायिक सौहार्दाचा नारा दिला.ईशान्येकडील राज्यांमध्ये अनुचित घटना नाही...ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यांमुळे विशेषत: या राज्यांमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत