शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

देशभरात शांततेत स्वातंत्र्यदिन साजरा, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिला विकासाचा नारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 06:06 IST

देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्तात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

नवी दिल्ली : देशभरात चोख सुरक्षा बंदोबस्तात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण आणि पथसंचलन पार पडले. निमलष्कर दलांसह विविध सुरक्षा दलांचा कार्यक्रमांमध्ये सहभाग होता.राज्य पातळीवरील ध्वजारोहणानंतर त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिक मुद्यांना भाषणांमध्ये प्राधान्य देतानाच विशेषत: सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधले. कलम ३७१ (एच) नुसार अरुणाचल प्रदेशला देण्यात आलेल्या सुविधा कायम राहतील, असे आश्वासन केंद्र सरकारने संसदेत दिल्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी इटानगर येथील इंदिरा गांधी पार्कमध्ये ध्वजारोहणानंतर भाषणात नमूद केले. सिक्किमला ३७१ (एफ) नुसार विशेष दर्जा देण्यात आला असून तो कायम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी म्हटले. मिझोराम आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी प्रगती आणि विकासाकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राष्टÑीय नागरिक नोंदणीसंबंधी भूमिकेचे समर्थन करतानाच भूमिहीन कुटुंबांना जमिनीचा अधिकार बहाल करण्यासाठी लवकरच नवे धोरण आणणार असल्याचे सांगितले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी फोन करून सरकारबाबत मते जाणून घेणार असल्याची माहिती दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘न्याय के साथ विकास’ आणि सांप्रदायिक सौहार्दाचा नारा दिला.ईशान्येकडील राज्यांमध्ये अनुचित घटना नाही...ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यांमुळे विशेषत: या राज्यांमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत