शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 22:13 IST

Pakistan ceasefire violation: पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून १०-१५ मिनिटं गोळीबार केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पण, पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे. 

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पाकिस्तानी सैनिकांनी कोणतेही कारण नसताना १०-१५ मिनिटं गोळीबार केल्याचेही या वृत्तांमध्ये म्हटले गेले. पण, हे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले असून, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे. 

काही माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये पुंछमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याचे म्हटले आहे. आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की, ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही, असे लष्कराकडून सांगण्यात आले. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशात मे महिन्यात लष्करी संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतातील काही ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. 

दोन्ही देशात १० मे रोजी शस्त्रसंधी झाली. तेव्हापासून सीमेवर शांतता आहे. याच शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेताना दिसत आहेत. 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला