शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

इस्रो बनवणार भारतीय रेल्वेला हायटेक, प्रत्येक डब्यात लागणार सीसीटीव्ही- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:48 IST

गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय.बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे.बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी इस्रोचीही मदत घेणार असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. ते दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी इस्रोचीही मदत घेणार असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.रेल्वेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी आरपीएफचे जवान व तसेच सर्व टीटीई यांना गणवेश परिधान करणं सक्तीचं करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या दृष्टीनं सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी इस्रो, रेल टेक आणि भारतीय रेल्वे एकत्रितरीत्या काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्रीपदावरून पायउतार करत ते पद पीयूष गोयल यांना बहाल करण्यात आलं होतं. मोदी सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पीयूष गोयल यांनी पाच कलमी योजना आखली होती. एका वर्षाच्या आत मानवरहीत फाटक बंद करा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्या बैठकीत दिले होते.मानवरहीत रेल्वे फाटक बंद करण्यासाठी तीन वर्षांचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. मानवरहीत रेल्वे फाटक आणि रुळावरून डबे घसरणे, यामुळे रेल्वे अपघात होतात. हे रोखण्यासाठी रेल्वेत ‘स्पीड’, ‘स्किल’ आणि ‘स्केल’ या धर्तीवर कामे करण्याचे आदेश पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या अपघातांची रेल्वे बोर्डातील अधिका-यांनी रेल्वेमंत्र्यांना माहिती दिली होती. मानवरहीत रेल्वे फाटकावर २०१६-१७ या कालावधीत ३४ टक्के अपघात झाले आहेत. नादुरुस्त रूळामुळे एक्स्प्रेस बोगी रुळावरून घसरते, अशी कारणे बोर्डाने दिली. तर रेल्वेत सुरक्षितता हीच प्राथमिकता असून, यात तडजोड करू नये, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्या.तर रेल्वे अपघातांच्या मालिकांमुळेच सुरेश प्रभू यांना राजीनामा द्यावा लागला होता.  रेल्वे अपघातामुळे राजीमाना देणारे सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वे मंत्री नव्हते. यापूर्वी सुद्धा रेल्वेमंत्र्यांचा ‘अपघाता’ने घात केला आहे. यंदा (२०१६-१७) रेल्वे अपघातात २३८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे बोगी रुळावरुन घसरल्यामुळे सर्वाधिक १९३ जण मरणमार्गावर स्वार झाले. उपलब्ध आकडेवारीनूसार गत १७ वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २०१५-१६ साली १२२ जणांचा मृत्यू झाला.यात बोगी घसरल्यामुळे ३६ जणांचा समावेश आहे. देशातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यास सक्षम नाही. हे या आकडेवारीवरुन हे सत्य पुन्हा एकदा ठळक होत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे