शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर, उत्तर प्रदेशातील मेघना श्रीवास्तव पहिली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:38 IST

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे .या परीक्षेत ८३.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नवी दिल्ली :   केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे .या परीक्षेत ८३.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशातील स्टेप बाय स्टेप महाविद्यालातील मेघना श्रीवास्तव बोर्डात पहिली आली आहे.तिला ५००पैकी ४९९ गुण मिळाले आहेत. तिने गाझियाबाद विभागातून परीक्षा दिली. पहिल्या तीन क्रमांकावर एकूण नऊ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून ८८.३१टक्के मुली तर ७८.९९ मुलांनी यश मिळवले आहे. दिव्यांग विभागातून विजय गणेश हा विद्यार्थी ५०० पैकी ४९२गुण मिळवत पहिला आला आहे. निकालानुसार एकूण १२हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ९५टक्क्यांपेक्षा जास्त तर ७२हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित केले आहेत. 

 यंदा इयत्ता बारावीची परीक्षा दि. ५ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची भारतातील ४ हजार १३८  तर परदेशातील ७१ केंद्रांवर परीक्षा झाली. मंडळाच्या www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहेत. 

      

ठळक मुद्दे :

  • २०१७-१८सालचा सीबीएसई बोर्डाचा बारावी निकाल जाहीर, ८३.०१ विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले, मागील वर्षी ८२.२टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • यंदाही मुलींची बाजी, उत्तीर्णांमध्ये ८८.३१ टक्के मुली आणि ७८.९९टक्के मुलांचा समावेश 

 

  • त्रिवेंद्रम विभागातून ९७.३२टक्के, चेन्नई विभागातून ९३.८७टक्के तर दिल्ली विभागातून ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • यंदाच्या निकालानुसार एकूण १२हजार ७३७ विद्यार्थ्यांनी ९५टक्क्यांपेक्षा जास्त तर ७२हजार ५६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादित केले आहेत. 

 

  • विदेशी शाळांमधील ९४. ९४टक्के विद्यार्थी उत्तीर्ण 

 

  • यंदा १०वी आणि १२वी मिळून सीबीएसई बोर्डामार्फत २८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात १६ लाख ३८हजार विद्यार्थ्यांनी दहावीची तर ११ लाख ८६हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. 

 

  • सीबीएसई इतिहासात पहिल्यांदाच पेपर फुटीच्या प्रकरणामुळे सीबीएसई बोर्ड चर्चेत आले होते. यामध्ये १०वीचा गणित तर १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. अखेर चर्चेनंतर १०वीची पुनर्परीक्षा घेण्यात आली नाही तर १२वीची अर्थशास्त्राची पुनर्परीक्षा २५एप्रिलला पार पडली. 

 

  • मागील्या वर्षी आलेल्या परीक्षेत नोएडा येथील रक्षा गोपाळ पाहिली, चंदीगढची भूमी सावंत दुसरी तर आदित्य जैन आणि मनंत लुथरा संयुक्तपणे तिसरे आले होते.  
टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८New Delhiनवी दिल्लीCBSE Examसीबीएसई परीक्षा