शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:21 IST

ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे.

नवी दिल्ली- ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. राजनाथ सिंह निवेदन देत असताना तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सीबीआय तोता है, तृणमूलच्या खासदारांची घोषणाबाजी देत सभागृह दणाणून सोडला. त्यादरम्यान राजनाथ सिंह यांनी भाषण दिलं आहे. कायद्याच्या संस्थांना अटकाव करणं देशहितासाठी योग्य नाही. संस्थांना काम करण्यापासून रोखल्यास व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील. केंद्रानं नेहमीच राज्यांच्या अधिकारांचा सन्मान केला आहे.पोलीस हे राज्यांतर्गत येतात. राज्यांनीही केंद्र सरकारच्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. कालची घटना ही संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवण्यासारखी आहे. राज्यपालांशी माझं बोलणं झालं असून, मी त्यांच्याकडून एक रिपोर्ट मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना काम करण्यापासून रोखू नये, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.लोकसभेत राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, कोलकात्यात सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांचं काम करण्यापासून रोखण्यात आलं. अशी घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना राजकीय संरक्षण दिलं जातंय.सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे. त्यामुळेच सीबीआयला आयुक्तांच्या घरी जावे लागले. या घोटाळ्यात नावाजलेल्या आणि राजकीय लोकांचा समावेश आहे. राजनाथ सिंह भाषण करत असतानाच तृणमूलच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. तृणमूल खासदारांच्या गदारोळानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह