शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

फोन टॅपिंग आरोपांची सीबीआय चौकशी - येडियुरप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:15 IST

फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी, अशी कर्नाटकच्या जनतेची भावना आहे.

बंगळुरू : जनता दल (एस) व काँग्रेसप्रणीत कुमारस्वामी सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग आरोपांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल. तशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनीच केली होती, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.आपल्यासह सुमारे ३०० नेत्यांचे फोन कुमारस्वामी सरकारने टॅप केले होते, असा आरोप जनता दल (एस)चे माजी प्रदेशाध्यक्ष व बंडखोर आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी केला होता. त्यावरून आता कर्नाटकमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या आरोपाची सीबीआयमार्फत चौकशी करून सत्य उजेडात आणा, अशी मागणी या राज्याचे माजी मुख्यमंंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनीही केली होती. त्याचाही येडियुरप्पा यांनी उल्लेख केला.फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी, अशी कर्नाटकच्या जनतेची भावना आहे. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचेही येडियुरप्पा यांनी सांगितले. तत्कालीन सरकारमधील गृहमंत्री एम. बी. पाटील, मल्लिकार्जुन खरगे यांनीही या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, या फोन टॅपिंग आरोपांचा माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांनी इन्कार केला होता व त्यांनी कुमारस्वामी यांची बाजू घेतली होती. (वृत्तसंस्था)सिद्धरामय्यांचे निकटवर्तीय होते लक्ष्यकाँग्रेस व जनता दल (एस)चे आघाडी सरकार असताना समन्वय समितीचे प्रमुख सिद्धरामय्यांच्या निकटवर्तीयांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप बंडखोर आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी केला होता. गुप्तचर यंत्रणा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेखाली येतात. त्यामुळे या टॅपिंग प्रकरणाची कुमारस्वामी यांना माहिती नव्हती हे संभवतच नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatakकर्नाटक