शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:27 IST

देशात वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच केरळमधील हा प्रकार समोर आला आहे. 

कोची - वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. मुस्लीम समाज मोठ्या संख्येने या विधेयकाविरोधात आवाज उचलत आहे तर हिंदू संघटनांही विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत. देशभरात या विधेयकावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु केरळमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चने मोर्चा उघडला आहे. 

माहितीनुसार, केरळमधील या चर्चच्या लोकांनी आरोप लावला आहे की, वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करत आहे. चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. वास्तविक, केरळच्या कोची जिल्ह्यात मुनंबम आणि चेराई नावाची दोन गावे आहेत. या गावातील गावकऱ्यांच्या जमीन आणि मालमत्तेवर वक्फ बोर्डाने बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वक्फ बोर्डाविरोधात मोर्चा उघडला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या गावात  ख्रिश्चन कुटुंबे राहत आहेत. दीर्घ काळ ते त्यांच्या मालमत्तेवर सरकारी करही भरत आहेत. त्यांच्याकडे याबाबत कागदपत्रे आहेत. मात्र आता या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. जमिनीची नोंदणी स्थानिक गावकऱ्यांच्या नावे आहे मग त्यावर वक्फ बोर्ड दावा कसं करू शकते असा सवाल या गावकऱ्यांनी केला आहे. या मुद्द्यांवरून सध्या चांगलेच राजकारण पेटले आहे. केरळमध्ये ज्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करत आहे त्यावर कित्येक पिढ्या ख्रिश्चन कुटुंब राहत आहेत.

उपोषणाचं हत्यार, लोकांचा वाढता विरोध

वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यामुळे हा विषय इतका चिघळला आहे की, ख्रिश्चन कुटुंबाच्या अनेकांनी याविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. ठिकठिकाणी लोकांचा विरोध वाढत आहे.  जर हा मुद्दा निकाली काढला नाही तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिरो मालाबार चर्चचे मुख्य मेजर आर्कबिशप राफेल थाटिल यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मुनंबम प्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. वक्फ बोर्डाच्या दाव्याविरोधात रविवारी जे विरोध प्रदर्शन झाले त्याचे नेतृत्व सिरो मालाबार चर्चने केले.  

टॅग्स :KeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकार