शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-१

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे
जात निर्मूलनासाठी आंदोलन : प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकले

नागपूर :
बंधुभावाची भावना ही जोपर्यंत जातीच्या पलीकडे जाणार नाही, तोपर्यंत भारतातील लोक एकत्र राहूच शकत नाही, हे वास्तव आहे. तेव्हा देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी या देशातील जाती नष्ट झाल्याच पाहिजे. ते केवळ बोलून होणार नाही, तर त्यासाठी जाती मुक्ती आंदोलनाची लढाई लढावी लागेल, असे जाहीर आवाहन करीत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे जाती मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात जाती मुक्ती आंदोलनाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला मुख्य निमंत्रक म्हणून ते बोलत होते. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. विचारवंत हनुमंतराव उपरे, डॉ. भारत पाटणकर, भीमराव बन्सोड, डॉ. गेल ऑम्वेट, ॲड. अनिल काळे, राजू लोखंडे, हरेंद्र श्रीवास्तव डॉ. संदीप नंदेश्वर, विनोद गजभिये, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य घटनेप्रमाणे प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संघटना उभी करण्याचाही अधिकार आहे. परंतु हे सर्व लोकशाहीच्या चौकटीत राहून असेल तर शांततेच्या मार्गाने सुरू आहे, असे म्हणता येते. परंतु धर्माच्या प्रचार प्रसाराच्या नावावर काही संघटना देशात हिंसाचार घडवितात. अशा संघटनांबाबत नागरिकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण अशा धर्मांध संघटनांच्याविरोधात काही राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या वाळीत टाकले आहे. परंतु हे काम केवळ राजकीय पक्षांनी घेऊन होणार नाही, यासाठी लोकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु जातीव्यवस्थेमध्ये अडकल्याने नागरिकांना यासंबंधात योग्य निर्णय घेता येत नाही, त्यामुळे जाती निर्मूलनाचे आंदोलन हे महत्त्वाचे ठरते.
भारताच्या राजकीय गुलामगिरीचे कारण हे मुळातच या देशातील जातीव्यवस्थेमध्ये आहे. तेव्हा राष्ट्र उभारणी करणाऱ्या संघटना ज्या सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची उभारणी करण्याच्या गोष्टी करीत आहेत. त्यातून देशात पुन्हा गुलामगिरी येणार नाही का, असा चिमटाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काढला.