शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे-१

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे

देशाच्या एकतेसाठी जाती नष्ट झाल्याच पाहिजे
जात निर्मूलनासाठी आंदोलन : प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकले

नागपूर :
बंधुभावाची भावना ही जोपर्यंत जातीच्या पलीकडे जाणार नाही, तोपर्यंत भारतातील लोक एकत्र राहूच शकत नाही, हे वास्तव आहे. तेव्हा देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी या देशातील जाती नष्ट झाल्याच पाहिजे. ते केवळ बोलून होणार नाही, तर त्यासाठी जाती मुक्ती आंदोलनाची लढाई लढावी लागेल, असे जाहीर आवाहन करीत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे जाती मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात जाती मुक्ती आंदोलनाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला मुख्य निमंत्रक म्हणून ते बोलत होते. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. विचारवंत हनुमंतराव उपरे, डॉ. भारत पाटणकर, भीमराव बन्सोड, डॉ. गेल ऑम्वेट, ॲड. अनिल काळे, राजू लोखंडे, हरेंद्र श्रीवास्तव डॉ. संदीप नंदेश्वर, विनोद गजभिये, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य घटनेप्रमाणे प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संघटना उभी करण्याचाही अधिकार आहे. परंतु हे सर्व लोकशाहीच्या चौकटीत राहून असेल तर शांततेच्या मार्गाने सुरू आहे, असे म्हणता येते. परंतु धर्माच्या प्रचार प्रसाराच्या नावावर काही संघटना देशात हिंसाचार घडवितात. अशा संघटनांबाबत नागरिकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण अशा धर्मांध संघटनांच्याविरोधात काही राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या वाळीत टाकले आहे. परंतु हे काम केवळ राजकीय पक्षांनी घेऊन होणार नाही, यासाठी लोकांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु जातीव्यवस्थेमध्ये अडकल्याने नागरिकांना यासंबंधात योग्य निर्णय घेता येत नाही, त्यामुळे जाती निर्मूलनाचे आंदोलन हे महत्त्वाचे ठरते.
भारताच्या राजकीय गुलामगिरीचे कारण हे मुळातच या देशातील जातीव्यवस्थेमध्ये आहे. तेव्हा राष्ट्र उभारणी करणाऱ्या संघटना ज्या सांस्कृतिक आधारावर राष्ट्राची उभारणी करण्याच्या गोष्टी करीत आहेत. त्यातून देशात पुन्हा गुलामगिरी येणार नाही का, असा चिमटाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काढला.