शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 09:42 IST

प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सैन्याच्या सुरक्षा दलांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हल्लेखोरांना जिवंत सोडले आणि घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करून माघारी परतले. प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 

कांगलेई यावोल कन्ना ग्रुपचा एक मैतेई उग्रवादी ग्रुप आहे. मणिपूरमधील अनेक हल्ल्यामध्ये त्यांचे नाव आलेले आहे. शनिवारी ते इथम गावात लपल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. यामुळे त्या गावातील नागरिकांना वाचविण्यासाठी तुकड्या रवाना झाल्या. या ठिकाणी डझनभर हल्लेखोर लपले होते. मात्र आर्मी आल्याचे पाहताच त्या गावातील महिलांनीच पुढाकार घेत त्यांना संरक्षण दिल्याचा प्रकार घडला.

दिवसभर या गावातील १५०० लोकांना समजाविण्याचे प्रयत्न करण्यात आले. लष्कराला या लोकांनी कारवाई करण्यापासून रोखले होते. जर सैन्याने कारवाई केली असती तर या नागरिकांनाही धोका होता. यामुळे सैन्याने या दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे जप्त केली आणि माघारी परतण्याचा निर्णय घेतला. 

 

मणिपुरमध्ये आरक्षणावरून कोकी कुकी आणि मैतेई समाजामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. दोन समुदायांमध्ये 3 मे रोजी पहिला संघर्ष झाला, त्यानंतर राज्याच्या विविध भागात सातत्याने हिंसाचार होत आहे. जातीय हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53% लोक मेईतेई समुदायातील आहेत, जे इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर, आदिवासी-नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ भागात राहतात. जवळपास दोन महिने मणिपूर धुमसत आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान