शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 09:42 IST

प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सैन्याच्या सुरक्षा दलांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हल्लेखोरांना जिवंत सोडले आणि घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करून माघारी परतले. प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. 

कांगलेई यावोल कन्ना ग्रुपचा एक मैतेई उग्रवादी ग्रुप आहे. मणिपूरमधील अनेक हल्ल्यामध्ये त्यांचे नाव आलेले आहे. शनिवारी ते इथम गावात लपल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. यामुळे त्या गावातील नागरिकांना वाचविण्यासाठी तुकड्या रवाना झाल्या. या ठिकाणी डझनभर हल्लेखोर लपले होते. मात्र आर्मी आल्याचे पाहताच त्या गावातील महिलांनीच पुढाकार घेत त्यांना संरक्षण दिल्याचा प्रकार घडला.

दिवसभर या गावातील १५०० लोकांना समजाविण्याचे प्रयत्न करण्यात आले. लष्कराला या लोकांनी कारवाई करण्यापासून रोखले होते. जर सैन्याने कारवाई केली असती तर या नागरिकांनाही धोका होता. यामुळे सैन्याने या दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे जप्त केली आणि माघारी परतण्याचा निर्णय घेतला. 

 

मणिपुरमध्ये आरक्षणावरून कोकी कुकी आणि मैतेई समाजामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. दोन समुदायांमध्ये 3 मे रोजी पहिला संघर्ष झाला, त्यानंतर राज्याच्या विविध भागात सातत्याने हिंसाचार होत आहे. जातीय हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53% लोक मेईतेई समुदायातील आहेत, जे इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर, आदिवासी-नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ भागात राहतात. जवळपास दोन महिने मणिपूर धुमसत आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान