शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Updated: July 18, 2016 18:26 IST

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, साहस फाउंडेशनच्या सरीता माळी, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप सुरवाडे, शिवसेनेच्या महिला संघटक मंगला बारी, महानगरप्रमुख शोभा चौधरी, सुनिता भालेराव, लता ढोबळे, मनसेच्या वैशाली विसपुते, दिलीप सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा शिरसाठ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी उपमहापौर करीम सालार, रोटरीचे गनी मेमन, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होेते. यावेळी अहमदनगर जिल्‘ातील कोपर्ली तसेच जळगावातील रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच अहमदनगर व जळगाव येथील अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेला मनोधैर्य योजनेतंर्गत मदत करण्यात येईल. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या मागण्यांचे निवेदन केले सादर
कोपर्डी गावातील आरोपी कोणाशीही संबंधित असले तरी त्यांना शासनाने कुठलीही गय न करता हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा.
रामेश्वर कॉलनीतील मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्यातील मुली व महिलांना मुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी मुक्त व सुदृढ वातावरण करण्यासाठी प्रचार व कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
पोलीस प्रशासनाबाबत लोकांच्या मनातील भीती कशामुळे कमी होतेय याबाबत गांभिर्याने आत्मचिंतन केले जावे.
अहमदनगर जिल्‘ातील अत्याच्याराच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर पावले उचलण्यात यावे.
महाराष्ट्रातील सर्व बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.