शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Updated: July 18, 2016 18:26 IST

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, साहस फाउंडेशनच्या सरीता माळी, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप सुरवाडे, शिवसेनेच्या महिला संघटक मंगला बारी, महानगरप्रमुख शोभा चौधरी, सुनिता भालेराव, लता ढोबळे, मनसेच्या वैशाली विसपुते, दिलीप सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा शिरसाठ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी उपमहापौर करीम सालार, रोटरीचे गनी मेमन, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होेते. यावेळी अहमदनगर जिल्‘ातील कोपर्ली तसेच जळगावातील रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच अहमदनगर व जळगाव येथील अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेला मनोधैर्य योजनेतंर्गत मदत करण्यात येईल. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या मागण्यांचे निवेदन केले सादर
कोपर्डी गावातील आरोपी कोणाशीही संबंधित असले तरी त्यांना शासनाने कुठलीही गय न करता हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा.
रामेश्वर कॉलनीतील मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्यातील मुली व महिलांना मुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी मुक्त व सुदृढ वातावरण करण्यासाठी प्रचार व कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
पोलीस प्रशासनाबाबत लोकांच्या मनातील भीती कशामुळे कमी होतेय याबाबत गांभिर्याने आत्मचिंतन केले जावे.
अहमदनगर जिल्‘ातील अत्याच्याराच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर पावले उचलण्यात यावे.
महाराष्ट्रातील सर्व बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.