शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात खटले चालवा धरणे आंदोलन : सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Updated: July 18, 2016 18:26 IST

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.

जळगाव : बलात्कार सारखे अघोरी कृत्य करणार्‍या नराधमांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच महिला संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, साहस फाउंडेशनच्या सरीता माळी, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप सुरवाडे, शिवसेनेच्या महिला संघटक मंगला बारी, महानगरप्रमुख शोभा चौधरी, सुनिता भालेराव, लता ढोबळे, मनसेच्या वैशाली विसपुते, दिलीप सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा शिरसाठ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी उपमहापौर करीम सालार, रोटरीचे गनी मेमन, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होेते. यावेळी अहमदनगर जिल्‘ातील कोपर्ली तसेच जळगावातील रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच अहमदनगर व जळगाव येथील अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रामेश्वर कॉलनी भागातील पीडितेला मनोधैर्य योजनेतंर्गत मदत करण्यात येईल. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या मागण्यांचे निवेदन केले सादर
कोपर्डी गावातील आरोपी कोणाशीही संबंधित असले तरी त्यांना शासनाने कुठलीही गय न करता हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा.
रामेश्वर कॉलनीतील मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
राज्यातील मुली व महिलांना मुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी मुक्त व सुदृढ वातावरण करण्यासाठी प्रचार व कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
पोलीस प्रशासनाबाबत लोकांच्या मनातील भीती कशामुळे कमी होतेय याबाबत गांभिर्याने आत्मचिंतन केले जावे.
अहमदनगर जिल्‘ातील अत्याच्याराच्या घटनांचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत कठोर पावले उचलण्यात यावे.
महाराष्ट्रातील सर्व बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.