शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 08:31 IST

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे.

जोधपूर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात भारताने खडतर विजय मिळविला होता. उंच डोंगर, पहाडांवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करत कब्जा केला होता. यामुळे त्यांना टिपणे भारतीय सैन्याला कठीण जात होते. तसेच उंचावरून खाली असलेले भारतीय जवान पाकिस्तानी सैन्यासाठी सोपे लक्ष्य बनत होते. अशावेळी जवानांच्या मदतीला बहाद्दूर योद्धा धावून आला. त्याने पाकिस्तानी सैन्याने ताबा घेतलेल्या जागांपेक्षा उंच जात एकेका सैनिकाला टिपले होते. आज हा योद्धा आपला निरोप घेतोय. 

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. आज जोधपूरच्या हवाई तळावरून मिग-27 च्या स्क्वॉड्रनची सात विमाने आकाशात झेपावर देशवासियांचा कायमचा निरोप घेणार आहेत. संरक्षण खात्याचे प्रवक्ते संबित घोष यांनी सांगितले की, 27 डिसेंबरला सात मिग-27 विमाने जोधपूर हवाई तळावरून शेवटचे उड्डाण करणार आहेत. याच दिवशी ही विमाने सेवेतून बाहेर होणार आहे. यानंतर ही विमाने पुन्हा कधीही उड्डाण करणार नाहीत. ही मिग-27 ची शेवटची स्क्वॉड्रन आहे. 

भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण मिग-27 ही विमानांची तुकडी केवळ भारताचीच शेवटची नसून जगातील शेवटची तुकडी असणार आहे. कारण आता कोणताही देश या विमानांचा वापर करत नाही. या विमानांचे पुढे काय करणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे घोष यांनी सांगितले. 

सेवेतून कमी केल्या गेलेल्या विमानांची शस्त्रास्त्रे आणि विमाने प्रदर्शनासाठी ठेवली जातात किंवा डेपोला दिली जातात. तर बऱ्य़ाचदा मित्र देशांना दिली जातात. जोधपूर एअरबेसवर दोन स्क्वॉड्रन होते. यापैकी एक याच वर्षी सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे. आज उड्डाण करणारी विमाने हवेत झेपावून पुन्हा जमिनीवर उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मिग-27 चे सर्व पायलट हजर राहणार आहेत. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन