शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 08:31 IST

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे.

जोधपूर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात भारताने खडतर विजय मिळविला होता. उंच डोंगर, पहाडांवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करत कब्जा केला होता. यामुळे त्यांना टिपणे भारतीय सैन्याला कठीण जात होते. तसेच उंचावरून खाली असलेले भारतीय जवान पाकिस्तानी सैन्यासाठी सोपे लक्ष्य बनत होते. अशावेळी जवानांच्या मदतीला बहाद्दूर योद्धा धावून आला. त्याने पाकिस्तानी सैन्याने ताबा घेतलेल्या जागांपेक्षा उंच जात एकेका सैनिकाला टिपले होते. आज हा योद्धा आपला निरोप घेतोय. 

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. आज जोधपूरच्या हवाई तळावरून मिग-27 च्या स्क्वॉड्रनची सात विमाने आकाशात झेपावर देशवासियांचा कायमचा निरोप घेणार आहेत. संरक्षण खात्याचे प्रवक्ते संबित घोष यांनी सांगितले की, 27 डिसेंबरला सात मिग-27 विमाने जोधपूर हवाई तळावरून शेवटचे उड्डाण करणार आहेत. याच दिवशी ही विमाने सेवेतून बाहेर होणार आहे. यानंतर ही विमाने पुन्हा कधीही उड्डाण करणार नाहीत. ही मिग-27 ची शेवटची स्क्वॉड्रन आहे. 

भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण मिग-27 ही विमानांची तुकडी केवळ भारताचीच शेवटची नसून जगातील शेवटची तुकडी असणार आहे. कारण आता कोणताही देश या विमानांचा वापर करत नाही. या विमानांचे पुढे काय करणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे घोष यांनी सांगितले. 

सेवेतून कमी केल्या गेलेल्या विमानांची शस्त्रास्त्रे आणि विमाने प्रदर्शनासाठी ठेवली जातात किंवा डेपोला दिली जातात. तर बऱ्य़ाचदा मित्र देशांना दिली जातात. जोधपूर एअरबेसवर दोन स्क्वॉड्रन होते. यापैकी एक याच वर्षी सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे. आज उड्डाण करणारी विमाने हवेत झेपावून पुन्हा जमिनीवर उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मिग-27 चे सर्व पायलट हजर राहणार आहेत. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन