शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

समाजमाध्यमांवरील मतांना कात्री लावू शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 05:59 IST

दिल्ली हायकोर्टाचा निर्वाळा : सावरकर चरित्रकाराची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : समाज माध्यमांवरील मतांना तसेच शैक्षणिक जगतातील चर्चांना कात्री लावली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने सावरकरांचे चरित्रकार डॉ. विक्रम संपत यांच्या याचिकेवर दिला.

संपत यांच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप करणाऱ्या लेखकांना रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हा निर्णय न्यायालयाने दिला. न्या. अमिम बन्सल यांनी संपत यांच्या याचिकेवर निर्णय देताना म्हटले की, तुम्ही लिखाण चोरले आहे, असे संबंधित लेखकांना वाटत असेल, तर त्यावर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा अधिकारच आहे. त्यांच्याविरुद्ध दर आठवड्याला एक याचिका घेऊन आमच्याकडे येऊ नका! तुम्ही शैक्षणिक जगातील चर्चांना कात्री लावू शकत नाही. 

विक्रम संपत यांनी सावरकरांचे दोन खंडातील चरित्र लिहिले आहे. या चरित्रात संपत यांनी आपले लिखाण चोरल्याचा आरोप अमेरिकी इतिहासकार डॉ. ऑड्री ट्रश्के, डॉ. अनन्या चक्रवर्ती आणि डॉ. रोहित चोप्रा यांनी केला आहे. त्यावर संपत यांनी याआधीच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर न्यायालयाने १८ फेब्रुवारी रोजी या तिघांना संपत यांच्याविरोधातील पत्रे प्रसिद्ध करू नये असे आदेश दिले होते. ट्रश्के यांचे पाच ट्विट काढून टाकण्याचे आदेशही ट्विटरला दिले होते.  त्यावर डॉ. संपत यांनी शुक्रवारी आणखी एक याचिका दाखल करून नवे ट्विट काढून टाकण्याची तसेच ट्रश्के यांचे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्याची मागणी केली. यावर न्या. बन्सल म्हणाले की, या पत्रात अवमानकारक असे काहीच नाही. तुमच्यावरील लिखाणचोरीचा आरोप चुकीचा आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्याचा प्रतिवाद करा. तुम्हीही तुमच्या समर्थनार्थ एखादे पत्र जारी करा. तुम्ही समाज माध्यमांवरील मतांना कात्री लावू शकत नाही. 

विद्वानांचे समर्थनआदेशानंतर ट्रश्के यांनी डॉ. संपत यांच्या विरोधातील मोहीम आणखी तीव्र करीत ७५ विद्वानांचे समर्थन असलेले एक पत्र पोस्ट करत नवीन पाच ट्विट केले.