शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द

By admin | Updated: June 30, 2017 17:28 IST

सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे. एक अधिकारी म्हणाला, सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे नाथू लाचा रस्ता खुला करण्यात आला नाही. कैलास मानसरोवर यात्रा रद्द केल्यानंतर जवळपास 800 भाविक निराश झाले आहेत. मात्र उत्तराखंड मार्गे यात्रा सुरूच राहील. भारतीय लष्करानं चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा उलटा कांगावा चीननं सुरू केला आहे. चीननं सिक्कीममध्ये नियंत्रण रेषेच्या वादाला भारत जबाबदार असल्याचा आरोप केला होता. चीनच्या पीपल्स लिब्ररेशन आर्मीने सुद्धा भारतीय जवानांसोबत धक्काबुक्की केली होती. तर बुधवारपासून नाथू ला खिंडीतून कैलास मानसरोवरला जाणा-या यात्रेकरूंना नाथू ला जवळ थांबवण्यात आलं आहे. 2015मध्ये चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी नाथू ला खिंडीतील मार्ग खुला केला होता. हा मार्ग तिबेटमार्गे नाथू ला खिंडीतून जातो. जोपर्यंत नियंत्रण रेषेवरून भारतीय जवान मागे हटत नाहीत, तोपर्यंत नाथू ला खिंडीचा मार्ग खुला करणार नसल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं सीमापार गेलेल्या जवानांना तात्काळ परत बोलावावं, असं आवाहनही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी केलं होतं. हिमालयातील सिक्कीम नाथू ला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू या मार्गानं जाऊ शकत होते. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, 2013 साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब आणि नादुरुस्त झाला होता. (सीमेवरून लष्कर हटवा अन्यथा मानसरोवरचा रस्ता बंद, चीनची भारताला धमकी)(चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!)उत्तराखंड आणि नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. नाथू ला खिंडीतून जाणाऱ्या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 1500 किमीच्या मार्गापर्यंत बसने जाता येत होते. हा नवा मार्ग सुरू करण्यासाठी तिबेटी लोकांनी बरीच तयारी केली होती. या 1 हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. 18 तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात. ही संपूर्ण यात्रा 23 दिवसांची असून 19 दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणशी 1.80 लाख रुपये येतो.