शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
3
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
4
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
5
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
6
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
7
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
8
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
9
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
10
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
11
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
13
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
14
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
15
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
16
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
17
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
18
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
19
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
20
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय

राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 10:37 IST

अनेकदा देशात किंवा राज्यात राजकीय पक्षांकडून बंदचं आवाहन केले जाते. या बंदमुळे बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे बंदबाबत देशभरातील विविध कोर्टांनी वेळोवेळी काय आदेश दिलेत हे जाणून घ्या.

नवी दिल्ली - कोलकाता आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरचा रेप आणि हत्या प्रकरणी पश्चिम बंगालमध्ये संतापाची लाट उसळली. याठिकाणी विद्यार्थ्यांकडून नबन्ना अभियान प्रोटेस्टच्या दुसऱ्या दिवशी भाजपानं १२ तासांसाठी बंद पुकारला. नबन्ना प्रोटेस्टवेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून हा बंद घोषित केला. या बंदविरोधात कोलकाता हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती जी फेटाळण्यात आली.

मुंबई हायकोर्टाने २३ ऑगस्टला बंदबाबत एक निर्णय दिला होता. ज्यात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदला चपराक दिली. बदलापूर येथे झालेल्या घटनेवर महाविकास आघाडीने राज्यभरात बंद पुकारला होता. ज्यावर हायकोर्टाने म्हटलं की, कुठल्याही राजकीय पक्षांना बंद करण्याची परवानगी नाही. जर कुणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असा इशारा हायकोर्टाने दिला होता. 

वकील सुभाष झा, गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात २ जनहित याचिका दाखल करत महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला परवानगी देऊ नये, हा बंद बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे असं म्हटलं होते. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशावर महाविकास आघाडीने बंद मागे घेतला. देशातील कोर्टांनी राजकीय पक्षांकडून पुकारण्यात आलेल्या बंदबाबत काय काय आदेश दिलेत हे जाणून घेऊया.

'बंद'साठी वेळोवेळी कोर्टाचे आदेश काय?

जुलै १९९७ रोजी भारत कुमार विरुद्ध केरळ सरकार प्रकरणी केरळ हायकोर्टाने म्हटलं होतं की, कुठलाही राजकीय पक्ष किंवा संघटना राज्यात अथवा देशात उद्योग आणि व्यवहार बंद करण्याचा दावा करू शकत नाही. स्वत:च्या फायद्यासाठी वाहतूक रोखणे योग्य नाही. मूलभूत अधिकारांचा विचार केल्यास बंद स्वीकारला जाऊ शकत नाही. कोर्टाने हा बंद बेकायदेशीर मानला होता. त्याचसोबत बंदचं आव्हान करणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना बंदवेळी झालेल्या नुकसान भरपाई सरकार आणि लोकांना देण्याचे आदेश दिले होते. 

हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले तेव्हा १९९७ मध्ये सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा फैसला कायम ठेवला. कुठल्याही नागरिकाचा मुलभूत अधिकार हा इतर व्यक्तीच्या दबावाखाली असू शकत नाही. बंद बोलवण्याचा आणि तो लागू करण्याचा अधिकार कुणालाच नाही हे हायकोर्टाने योग्य म्हटलंय असं सुप्रीम कोर्टाने आदेशात सांगितले. 

बीजी देशमुख अँन्ड कंपनी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं २३ जुलै २००४ ला आदेश दिले होते. ज्यात बंदमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा हवाला देण्यात आला आहे. हायकोर्टाने बंद लागू करणं बेकायदेशीर ठरवलं. त्यासोबत बंदचं आव्हान करणाऱ्या राजकीय पक्ष, संघटना, समुह अथवा व्यक्ती यांना कायदेशीर कलम १४९ अंतर्गत नोटीस बजवावी. त्यात स्पष्टपणे बंदमध्ये सहभागी राजकीय पक्ष, संघटना, समुह अथवा लोक यांच्यामुळे बंदमध्ये झालेली जीवित हानी अथवा मालमत्तेचे नुकसान यासाठी जबाबदार धरण्यात यावे. कायदेशीर कारवाईसोबतच पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी असेल असं हायकोर्टानं म्हटलं.

दरम्यान, राजकीय पक्षांकडून पुकारण्यात येणाऱ्या बंदचा सामना करण्यासाठी कायदे तयार करावेत असं मुंबई हायकोर्टाने २००९ मध्ये राज्य सरकारला आदेश दिले होते. २०१९ मध्ये सबरीमाला प्रकरणी राज्यात संप पुकारण्यापूर्वी ७ दिवस आधी नोटीस द्यावी असं केरळ हायकोर्टाने सांगितले होते. तर बंदबाबत घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आणि असंविधानिक असल्याचं २०१९ मध्ये गुवाहाटी हायकोर्टाने एका प्रकरणात म्हटलं होते.  

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय