शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बॉम्ब आणि दगडफेक होताना जवानांना मरण्यास सांगू शकत नाही- रावत

By admin | Updated: May 28, 2017 16:40 IST

दगडफेक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी लष्कराच्या जीपवर काश्मिरी युवकाला बांधणा-या मेजर नितीन गोगोई यांचं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - काश्मिरी तरुणाला जीपला बांधणारे मेजर नितीन गोगोई यांना लष्कराने सन्मानित केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून वाद उफाळून आला होता. त्याच पार्श्वभूमीवर लष्कराच्या जीपवर काश्मिरी युवकाला बांधणा-या मेजर नितीन गोगोई यांचं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केलं आहे. यावेळी रावत यांनी जवानांचं कौतुक करत काश्मीरमधील "डर्टी वॉर"शी दोन हात करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा शोध लावण्याची गरज असल्याचंही मतंही मांडलं आहे. ज्यावेळी लोक बॉम्ब आणि दगडफेक करत असतील त्यावेळी मी आमच्या लोकांना सर्वकाही पाहत राहून मरण्यासाठी सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, आंदोलकांनी दगडफेकीऐवजी गोळीबार केला असता तर मला फारच आनंद झाला असता. काश्मीरच्या मुद्द्यावर ठोस उपाय करण्याची गरज आहे. तसेच यात प्रत्येकाला सामावून घेतले पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जीपवर स्थानिक तरुणाला बांधणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर फुटीरतावादी नेते आणि काही राजकीय पक्षांनी त्या मेजरवर टीकेची झोड उठवली होती. तर दुसरीकडे केंद्र सरकारने या मुद्द्यावर लष्कराला साथ दिली आहे. नितीन गोगोई यांनी माध्यमांचा या घटनेचा वृत्तांत सांगितला होता. 

काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय आपल्याला का घ्यावा लागला ? त्यावेळी काय परिस्थिती होती त्याची गोगोई यांनी विस्तृत माहिती दिली होती. "काश्मीरमध्ये निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी शांतता राखण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मला मतदान केंद्रावर दगडफेक होत असल्याचे समजल्यानंतर मी तिथे गेलो. चार निवडणूक कर्मचारी आणि सात आयटीबीपीच्या जवानांची सुटका केली. आम्ही बाहेर आलो तेव्हा आमच्यावर सर्व बाजूंनी दगडफेक सुरु होती. दगडफेक करणारे आमच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकत होते. अशा परिस्थिती स्थानिक आणि निवडणूक कर्मचा-यांना वाचवण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधण्याचा निर्णय घ्यावा लागला," असे मेजर गोगोई यांनी सांगितले होते. 

मेजर नितीन गोगोई यांना नुकतेच दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित करण्यात आले होते.  लष्कराने गोगोई यांच्यावर होत असलेल्या टीकेला झिडकारून लावत त्यांचा सन्मान केला आहे. एक सर्वसामान्य जवान ते आर्मी सर्व्हिस कॉपमध्ये मेजरच्या हुद्यापर्यंत पोहोचलेल्या गोगोई यांच्या एका युवकाला जीपला बांधून मानवी ढाल बनवण्याच्या कृतीवर फार टीका झाली होती.  गोगोई यांच्यावर मानवाधिकार आणि जिनेव्हा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप लागला होता.