शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुसळधार पावसाने ‘चारधाम’ यात्रा स्थगित

By admin | Updated: June 26, 2015 23:46 IST

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व पुराने ‘चारधाम’ यात्रेकरू अडकून पडले असून, त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी सहा हेलिकॉप्टर्सची मदत

डेहराडून : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व पुराने ‘चारधाम’ यात्रेकरू अडकून पडले असून, त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी सहा हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जात आहे. दरम्यान, ‘चारधाम’ यात्रा काही काळ स्थगित करण्यात आली आहे.रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्णातील किमान सहा रस्ते वाहून गेल्यामुळे बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, केदारनाथ, गोविंद घाट, घांघरिया आदी ठिकाणी हजारो भाविक अडकून पडले आहेत. गोविंद घाटाजवळील पूल वाहून गेल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.केदारनाथ, हेमकुंड साहिब व बद्रीनाथ भागातून ९०० यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दुसऱ्या दिवशीही चारधाम यात्रा विस्कळीत राहिली.सध्या केदारनाथला एकही यात्रेकरू नसून त्यांना सोनप्रयाग येथे आणण्यात आले आहे. वातावरण अनुकूल झाल्यानंतर ते पुढील प्रवास सुरू करतील, असे अतिरिक्त मुख्य सचिव राकेश शर्मा यांनी डेहराडून येथे सांगितले. (वृत्तसंस्था)