शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'उज्ज्वला' योजनेत घोटाळा; कॅगनं ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:10 IST

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कॅगनं ताशेरे ओढले आहेत.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारच्या यशस्वी योजनांमध्ये उज्ज्वला योजनेचा उल्लेख केला जातो. 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजनेची घोषणा केली. स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील कोट्यवधी महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले होते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत गॅस जोडणी दिली जात असून, आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या दिल्याचा मोदी सरकारनं दावा केलेला आहे. परंतु मोदी सरकारच्या या दाव्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत.कॅगच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. उज्ज्वला योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतोय. गरिबांऐवजी गरज नसलेल्यांना या योजनेचा लाभ दिला जातोय. कॅगनं या योजनेतील अनेक त्रुटी दाखवल्या आहेत. एलपीजी गॅसच्या नियमित वापरासाठी प्रोत्साहन देणं हे मोठं आव्हान आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थी हे अत्यंत गरीब असल्यामुळे सिलिंडर घेणं त्यांना परवडण्याजोगं नाही. एखादा सिलिंडर वापरून रिकामा झाल्यानंतर तो लागलीच भरण्याएवढा त्यांच्याकडे पैसा नसतो.उज्ज्वला योजनेंतर्गत 1.93 कोटी लाभार्थ्यांना जोडण्या दिलेल्या असून, त्यापैकी फक्त 3.66 लाख लोकांनी वर्षभरात एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा भरलेला आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत 3.18 कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार केला असता वर्षाला फक्त 3.21 लाख एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा भरले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उज्ज्वला योजनेंतर्गत घेतलेले सिलिंडर भरले जात नसल्याचं धक्कादायक वास्तव कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. उज्ज्वला योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना एलपीजी जोडणी दिली जात असली तरी पुरुषांनाही तब्बल 1.88 लाख जोडण्या दिल्याचं उघड झालेलं आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजना