शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'उज्ज्वला' योजनेत घोटाळा; कॅगनं ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:10 IST

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कॅगनं ताशेरे ओढले आहेत.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकारच्या यशस्वी योजनांमध्ये उज्ज्वला योजनेचा उल्लेख केला जातो. 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजनेची घोषणा केली. स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील कोट्यवधी महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले होते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत गॅस जोडणी दिली जात असून, आतापर्यंत आठ कोटींहून अधिक जोडण्या दिल्याचा मोदी सरकारनं दावा केलेला आहे. परंतु मोदी सरकारच्या या दाव्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत.कॅगच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. उज्ज्वला योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतोय. गरिबांऐवजी गरज नसलेल्यांना या योजनेचा लाभ दिला जातोय. कॅगनं या योजनेतील अनेक त्रुटी दाखवल्या आहेत. एलपीजी गॅसच्या नियमित वापरासाठी प्रोत्साहन देणं हे मोठं आव्हान आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थी हे अत्यंत गरीब असल्यामुळे सिलिंडर घेणं त्यांना परवडण्याजोगं नाही. एखादा सिलिंडर वापरून रिकामा झाल्यानंतर तो लागलीच भरण्याएवढा त्यांच्याकडे पैसा नसतो.उज्ज्वला योजनेंतर्गत 1.93 कोटी लाभार्थ्यांना जोडण्या दिलेल्या असून, त्यापैकी फक्त 3.66 लाख लोकांनी वर्षभरात एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा भरलेला आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत 3.18 कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार केला असता वर्षाला फक्त 3.21 लाख एलपीजी गॅस सिलिंडर पुन्हा भरले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उज्ज्वला योजनेंतर्गत घेतलेले सिलिंडर भरले जात नसल्याचं धक्कादायक वास्तव कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. उज्ज्वला योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना एलपीजी जोडणी दिली जात असली तरी पुरुषांनाही तब्बल 1.88 लाख जोडण्या दिल्याचं उघड झालेलं आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजना