शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइलला बंदी!

By admin | Updated: October 23, 2016 04:40 IST

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर शत्रू देशांकडून, विशेषत: पाकिस्तान व चीनकडून, सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता, यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोबाइल फोन आणायलाच

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर शत्रू देशांकडून, विशेषत: पाकिस्तान व चीनकडून, सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेता, यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोबाइल फोन आणायलाच पंतप्रधान कार्यालयाने बंदी घातली आहे. पाकिस्तान व चीनकडून सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. अगदी बँकांनाही हा इशारा देण्यात आला आहे. त्याचमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाच्या मुद्यांवर घेण्यात आलेले निर्णय व विविध धोरणांसंबंधीची अतिसंवेदनशील वा कोणतीही माहिती बाहेर फुटू नये, यासाठी उद्देशाने हा खबरदारीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोबाइल फोनच्या बंदीसंदर्भात अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्रीय सचिवालयाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कोणत्याही बैठकीत स्मार्ट फोन, मोबाइल फोन वापरण्यावर परवानगी नाकारण्यात आली असून, यासंबंधी प्रत्येक मंत्र्यांना, त्यांच्या खासगी सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची योग्य ती माहिती द्यावी, असे केंद्रीय सचिवालयाने या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. सर्जिकल स्ट्राइक्समुळे बिथरलेला पाकिस्तान आता स्मार्ट फोन, मोबाइल फोनसारख्या यंत्रामधील डेटा हॅक करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. यासाठी दक्षता म्हणून अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांचे मोबाइल फोन आॅफिसमधील कॅम्प्युटर आणि लॅपटॉपला जोडू नयेत, असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय या भागांतही स्मार्टफोनवर वापरावर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कार्यालयांत जाणाऱ्या व्यक्तींच्या स्मार्ट व मोबाइल फोनवरही बंधने घातली जाणे अपेक्षित आहे.