शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

गुजरात दंगलीत मोदींना लक्ष्य करणारे झाले कॅबिनेट मंत्री

By admin | Updated: July 5, 2016 21:01 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोदींनी अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोदींनी अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एमजे अकबर यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. अकबर यांनी गुजरात दंगलीच्या वेळी मोदींवर टीका केली होती. तरीही मोदींनी त्यांना मंत्रिपद बहाल केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.

एमजे अकबर हे 1989मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमधले होते. काँग्रेसकडूनच त्यांना पहिली खासदारकी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशमधून 65 वर्षीय अकबर हे भाजपाकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. अकबर हे भाजपामधला स्पष्टवक्ते नेता आणि आधुनिक मुस्लिम चेहरा समजला जातो. त्यांनीच मोदींच्या विकासाच्या माध्यमातून हिंदुत्व हा मुद्दा दूर नेला. त्यामुळे पक्षाची बाजू मांडण्यासाठी भाजप त्यांना नेहमीच पुढे करते.

भाजपाच्या प्रवक्त्याच्या रुपात त्यांनी अनेकदा सरकारच्या परराष्ट्र धोरणावर चर्चाही केली आहे. त्यांनी वृत्तपत्राचं संपादकपदही भूषवलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनावर त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. 1980च्या दशकात राजीव गांधींच्या जवळ गेल्यानं त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तसेच 1989मध्ये बिहारच्या किशनगंजमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र त्या वर्षी काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. 1991मध्ये गांधी हत्येनंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते पत्रकारितेत सक्रिय झाले. 2002ला गुजरात दंगलीच्या वेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली होती. मात्र त्यानंतर ते भाजपाच्या जवळ आले. अकबर हे इंग्रजी बोलण्यात निष्णात आहेत. त्यामुळे ते एका मुस्लिम नेत्यांची कमी भरून काढतील, अशी भाजपाला आशा आहे.